ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

संवादक : “ऑरोविलमधील रहिवासी तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील.”

श्रीमाताजी : तेथील रहिवासी त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार आणि त्यांच्याकडील साधनांनुसार, तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील. तो सहभाग यंत्रवत् नसावा तर जिवंत आणि खराखुरा असावयास हवा. तो प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असेल : म्हणजे, ज्यांच्याकडे भौतिक साधने आहेत, उदा. ज्याच्याकडे कारखान्यात निर्माण होणारे उत्पादन असेल तो त्यातील काही हिस्सा उत्पादनाच्या प्रमाणात पुरवेल. दर माणशी, दरडोई असे येथे काही नसेल…..

संवादक : “सहभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतो”… म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की जे ज्ञानी आहेत, जे आंतरिकरित्या काम करतात…

श्रीमाताजी : हो, तसेच आहे. ज्यांना उच्चतर असे आंतरिक ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांनी प्रत्यक्ष हातांनीच काम करायला हवे असे नाही, असे मला म्हणावयाचे आहे.

संवादक : “तेथे कोणतेही कर नसतील, पण प्रत्येकाने सामूहिक हितासाठी कर्मरूपाने, वस्तुरूपाने किंवा द्रव्यरूपाने योगदान द्यावयास हवे.”

श्रीमाताजी : हो हे अगदी स्पष्ट आहे : तेथे कर नसतील. पण प्रत्येकाने सामूहिक हितासाठी त्याच्या त्याच्या कर्माद्वारे, किंवा द्रव्य वा वस्तुरुपाने योगदान देणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे केवळ पैसाच आहे, अन्य काही नाही; ते पैसाच देतील. पण खरे सांगावयाचे तर, येथे ‘कर्म’ म्हणजे आंतरिक कर्म अपेक्षित आहे. – पण तसे उघडपणे म्हणता येत नाही, कारण लोक पुरेसे प्रामाणिक नसतात. कर्म हे पूर्णपणे आंतरिक, गूढ स्वरूपाचे असू शकते, पण त्यासाठी ते पूर्णपणे प्रामाणिक आणि सचोटीचे असावयास हवे, तसे करण्याची क्षमता हवी, ढोंग नको.

खरेतर, भौतिकदृष्ट्या प्रत्येक मानवाचा अधिकार आहे… पण तो ‘हक्क’ नाही… व्यवस्थाच अशी असली पाहिजे की, ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या भौतिक गरजांच्या पूर्तीची काळजी घेतली जाईल; ती पूर्तता हक्क आणि समतेच्या संकल्पनेनुसार नसेल, तर कमीतकमी गरजांवर आधारित असेल. आणि एकदा का अशा व्यवस्थेची घडी बसली की, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या – आर्थिक साधनांनुसार नव्हे – तर आंतरिक क्षमतांनुसार त्याचे त्याचे जीवन घडविण्याचे स्वातंत्र्य असेल.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 265-66)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago