जर सर्व देशांमध्ये ऑरोविलच्या निर्मितीविषयी स्वारस्य जागृत होऊ शकले तर, त्यांनी आजवर जी चूक केली आहे, त्याचे परिमार्जन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हळू हळू येऊ लागेल. आणि स्वाभाविकपणेच, जेव्हा मला हे दाखविण्यात आले तेव्हा माझ्या लक्षात आले. ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम अदृश्यामध्ये काय व कसा झाला आहे, हे मला उमगले.
ही कृती भौतिकातील, बाह्यवर्ती अशी नव्हती. ती अदृश्यातील कृती होती. आणि तेव्हापासून, सर्व देशांना हे कळावे म्हणून मी प्रयत्नशील आहे. परंतु त्यांना असे वाटते की, ते हुशार आहेत, त्यांना कोणी काही शिकवावयाची गरज नाही. म्हणून मी जे प्रयत्न करीत आहे, ते बाह्य स्वरूपाचे नसून आंतरिक, अदृश्यातील प्रयत्न आहेत…
तुम्हाला सांगावयाचे झाले तर, विविध देश ऑरोविलच्या निर्मितीमध्ये सहयोगी झाले तर, त्यांच्या अगदी थोड्याशा सहभागाने देखील त्यांचे भले होईल. त्यांच्या कृतीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात त्यांचे भले होईल.
– श्रीमाताजी
(The Mother: Mother’s Agenda, September 21, 1966)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…