जर सर्व देशांमध्ये ऑरोविलच्या निर्मितीविषयी स्वारस्य जागृत होऊ शकले तर, त्यांनी आजवर जी चूक केली आहे, त्याचे परिमार्जन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हळू हळू येऊ लागेल. आणि स्वाभाविकपणेच, जेव्हा मला हे दाखविण्यात आले तेव्हा माझ्या लक्षात आले. ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम अदृश्यामध्ये काय व कसा झाला आहे, हे मला उमगले.
ही कृती भौतिकातील, बाह्यवर्ती अशी नव्हती. ती अदृश्यातील कृती होती. आणि तेव्हापासून, सर्व देशांना हे कळावे म्हणून मी प्रयत्नशील आहे. परंतु त्यांना असे वाटते की, ते हुशार आहेत, त्यांना कोणी काही शिकवावयाची गरज नाही. म्हणून मी जे प्रयत्न करीत आहे, ते बाह्य स्वरूपाचे नसून आंतरिक, अदृश्यातील प्रयत्न आहेत…
तुम्हाला सांगावयाचे झाले तर, विविध देश ऑरोविलच्या निर्मितीमध्ये सहयोगी झाले तर, त्यांच्या अगदी थोड्याशा सहभागाने देखील त्यांचे भले होईल. त्यांच्या कृतीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात त्यांचे भले होईल.
– श्रीमाताजी
(The Mother: Mother’s Agenda, September 21, 1966)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…