जर सर्व देशांमध्ये ऑरोविलच्या निर्मितीविषयी स्वारस्य जागृत होऊ शकले तर, त्यांनी आजवर जी चूक केली आहे, त्याचे परिमार्जन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हळू हळू येऊ लागेल. आणि स्वाभाविकपणेच, जेव्हा मला हे दाखविण्यात आले तेव्हा माझ्या लक्षात आले. ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम अदृश्यामध्ये काय व कसा झाला आहे, हे मला उमगले.
ही कृती भौतिकातील, बाह्यवर्ती अशी नव्हती. ती अदृश्यातील कृती होती. आणि तेव्हापासून, सर्व देशांना हे कळावे म्हणून मी प्रयत्नशील आहे. परंतु त्यांना असे वाटते की, ते हुशार आहेत, त्यांना कोणी काही शिकवावयाची गरज नाही. म्हणून मी जे प्रयत्न करीत आहे, ते बाह्य स्वरूपाचे नसून आंतरिक, अदृश्यातील प्रयत्न आहेत…
तुम्हाला सांगावयाचे झाले तर, विविध देश ऑरोविलच्या निर्मितीमध्ये सहयोगी झाले तर, त्यांच्या अगदी थोड्याशा सहभागाने देखील त्यांचे भले होईल. त्यांच्या कृतीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात त्यांचे भले होईल.
– श्रीमाताजी
(The Mother: Mother’s Agenda, September 21, 1966)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…