ऑरोविल ह्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. त्याच्या संस्थापक श्रीमाताजी यांनी, ऑरोविल विषयीची त्यांची भूमिका ‘ऑरोविलची सनद’ यामध्ये स्पष्ट केली आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असताना, ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून या सनदीचे सोळा भाषांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले.
ऑरोविल मधील लहान मोठे निर्णय घेताना, धोरणे ठरविताना या सनदीचा आधार घेतला जातो. यामध्ये नमूद केलेल्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याचा प्रयत्न केला जातो. ऑरोविलमध्ये जीवन जगू इच्छितात, त्यांच्यासाठी असलेली ही मार्गदर्शक तत्त्वेच आहेत.
१२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ‘ऑरोविलची सनद’ देखील ह्यासोबत ठेवण्यात आली.
…ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…