फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक दिव्य जीव जन्माला आला.या पृथ्वीतलावर लोकांमध्ये ईश्वरी प्रेमभावना जागृत करावी, ह्या हेतूने त्याने जन्म घेतला होता. पण लोकांना त्याच्या पाठीमागची उदात्त भावना समजू शकली नाही, लोकांचा गैरसमज झाला, त्यांनी त्याच्यावर संशय घेतला, ते हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागले. लोकांनी त्याच्यावर अनैतिकतेचे आरोप केले. सरतेशेवटी, यासर्वांपासून दूर जाऊन, शांतपणे दुसरीकडे कोठेतरी आपले इच्छित कार्य करीत, मृत्यू स्वीकारावा असे त्याच्या मनाने घेतले. तरीही लोकांनी त्याचा पिच्छा पुरविला, शेवटी त्याला तेथून पळ काढावा लागला…
अचानकपणे, त्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये त्याला एक छोटेसे डाळिंबाचे झाड दिसले. त्या झाडाच्या फांद्यांच्या छायेमध्ये अखेरचा विसावा घ्यावा म्हणून तो तेथे विसावला… थेंबाथेंबाने त्याचे रक्त त्या मातीमध्ये मिसळत गेले. ती भूमी सुपीक होत गेली. काही दिवसांतच ते झाड आश्चर्यकारकरित्या मोठे झाले. ते उंच, मोठे, दाट झाले. ते इतके विशाल झाले की येणारेजाणारे प्रवासी त्याच्या छायेत सुखाने विसावू लागले. ते झाड लालकेशरी, भरगच्च पाकळ्या असणाऱ्या सुंदर फुलांनी बहरून गेले. लोकांना समजले देखील नाही की, ज्याच्या मागे ते हात धुऊन लागले होते तोच येथे कायमचा विसावला आहे. या नाहीतर त्या रूपात, त्या दिव्य जीवाने आपले ईश्वरीय प्रेम लोकांमध्ये प्रसृत करण्याचे कार्य चालूच ठेवले…
कालांतराने डाळिंबाची फुले “दिव्य प्रेम’ या नावाने ओळखली जाऊ लागली. (महाशक्तीच्या सर्व रूपांपैकी कालीमाता हे तिचे सर्वात प्रेमळ रूप आहे असे श्रीमाताजी सांगतात. कालीपूजेच्या दिवशी हीच डाळिंबाची फुले श्रीमाताजी दर्शनार्थीना वितरित करीत असत.)
-श्रीमाताजी
(CWM 153 192)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…