एक जण मानवी एकतेचा प्रचार करण्यासाठी जगप्रवास करीत होता. मीरा जपानमध्ये असताना, तिची त्या व्यक्तीशी टोकियो येथे भेट झाली. “अमुक अमुक झाले तर किती बरे होईल? प्रत्येकजण सुखी होईल, प्रत्येक जण दुसऱ्याला समजून घेऊ शकेल, कोणीही कोणाशी भांडणार नाही.” अशा कल्पनेचा प्रचार करीत तो जगभर हिंडत असे. लोक त्याला त्याचे नाव विचारत, तेव्हा तो सांगत असे, “मी टॉलस्टॉय.”
लोक अचंबित होऊन विचारत, “ओ, तुम्हीच का ते टॉलस्टॉय?” बिचाऱ्या लोकांना माहीत नव्हते की ‘लिओ टॉलस्टॉय’ आता हयात नाहीत. लोकांना वाटत असे, व्वा ! आपण किती भाग्यवान ! आपल्याला खुद्द टॉलस्टॉय भेटले.
मीरेने त्यास विचारले, “पण ही मानवी एकता कशी साध्य करावयाची?”
तो म्हणाला, “ते तर अगदीच सोपे आहे. प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण एकाच प्रकारचा पोषाख परिधान करेल, प्रत्येक जण सारखेच जीवन जगेल, प्रत्येक जण सारख्याच प्रकारचे जेवण करेल, अगदी सोपे आहे.”
मीरा म्हणाली, “तर मग ही अशी एकता फारच भयंकर असेल.” पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. मीरा मग पुढे काही बोललीच नाही. कारण मीराला काय म्हणायचे होते ते त्याला समजण्याच्या पलीकडचे होते.
वरील तथाकथित मानवी एकतेचे प्रचारक सुविख्यात रशियन साहित्यिक ‘लिओ टॉलस्टॉय’ नव्हते तर तो होता त्यांचा एक मुलगा! आणि मीरा म्हणजे ‘मीरा अल्फासा’ अर्थात श्रीमाताजी.
श्रीमाताजी तेव्हा त्याला जे सांगू इच्छित होत्या ते ‘मानवी एकते’चे श्रीमाताजींच्या मनातील चित्र आज साकारू पाहत आहे ‘ऑरोविल’च्या रूपात!
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…