(आश्रमातील एक साधक श्री.पूजालाल यांच्या आठवणींमधून…)
पहाटेचे पाच वाजले होते. नेहमीप्रमाणे, मी त्या पवित्र वास्तुत गेलो, जेथे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी रहात. मला त्या घराच्या काही भागाच्या साफसफाईचे काम करण्याची मुभा देण्यात आली होती. मी जेव्हा तेथे कामाला जात असे तेव्हा श्रीमाताजी स्वत: दार उघडायला येत असत आणि माझ्या आनंददायी कामाची सुरुवात होत असे. पण एके दिवशी दार उघडल्यावर, श्रीमाताजी तेथेच उभ्या राहिल्या आणि श्रीअरविंदांचा संदर्भ देत, मला त्यांनी दिवसभर अतिशय काळजीपूर्वक आणि शांतपणे काम करण्यास सांगितले; जेणेकरून मधल्या मोठ्या दरवाजाच्या वरच्या बाजूला विसावलेल्या चिमणीला त्रास होऊ नये.
हा जणु परमेश्वरी आदेशच आहे असे समजून, मी सावधगिरीने वागेन अशी त्यांना हमी दिली. मी आत प्रवेश केला आणि मग श्रीमाताजी निघून गेल्या. कोणताही आवाज न करता, अगदी हलक्या पावलाने मी त्या दरवाजासमोरून गेलो आणि आश्चर्याची व आनंदाची बाब म्हणजे ती चिमणी सर्वात वरच्या बाजूला अगदी शांतपणे, निस्तब्ध बसलेली होती. मी थक्क झालो.
आमचे दिव्य गुरु किती करुणामय आहेत ! ते रात्री त्या हॉलमध्ये फेऱ्या मारीत असत. तेव्हा त्यांनी त्या छोट्या पाखराला नेहमीच शांततामय असणाऱ्या त्या वातावरणात, रात्रीची विश्रांती घेत असलेले पाहिले.
त्यांच्या करुणार्द्र दृष्टीचा लाभ केवळ आम्हा मनुष्यप्राण्यांनाच होत होता असे नव्हे, तर त्यांच्या वैश्विक हृदयामध्ये लहान आणि मोठे अशा साऱ्यांनाच प्रेमाचे स्थान होते. खरोखरीच, आपण सारे भाग्यवान आणि ही पृथ्वीही भाग्यवान की, जिच्यामध्ये दिव्य गुरु, विश्वाचा स्वामी मूर्त रूपात वास करीत आहे; आपल्या उच्च स्थानावरून त्याने आमच्यासाठी कायमस्वरूपी कृपाछत्र धरले आहे आणि आपल्या प्रेममयी हृदयाच्या खोलीमध्ये त्यांनी आम्हाला आसरा दिला आहे.
– श्री.पूजालाल
(Reminiscences of Pujalal : Pg 80)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…