१९१४ मध्ये जेव्हा श्रीअरविंदांनी ‘आर्य’ मासिकासाठी लिखाण करावयास सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट. ते जे लिखाण करीत असत त्याला मानसिक ज्ञान किंवा मनोनिर्मिती असे म्हणता येणार नाही.
श्रीअरविंद मन निश्चल करून, टंकलेखनयंत्रासमोर बसत असत. आणि उच्च स्तरावरून जे त्यांच्यामध्ये प्रवाहित होत असे ते त्यांच्या टंकलेखन करणाऱ्या बोटांच्या माध्यमातून थेट कागदावर उमटत असे. अशा मानसिक निश्चल स्थितीमध्ये ‘आर्य’साठी ते पानेच्या पाने एकटाकी पद्धतीने टंकलिखित करीत असत.
अशा रीतीने १९१४ ते १९२१ या कालावधीत श्रीअरविंदांनी टंकलिखित केलेले सर्व प्रमुख लिखाण ‘आर्य’ या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. The Life Divine, The Human Cycle, The Ideal of Human Unity, Essays on the Gita, The Secret of the Veda, The foundation of Indian Culture ग्रंथसंपदा त्यांनी ह्याच काळात लिहिलेली आहे. ‘Synthesis of Yoga’ हा ग्रंथही ‘आर्य’ मधूनच प्रथम क्रमश: प्रकाशित झाला.
(Stories told by the Mother 11: Page 31)
*
[या काळात मीरा रिचर्ड्स (श्रीमाताजी) व त्यांचे पती पॉल रिचर्ड्स असे दोघे मिळून आर्य मासिकाच्या फ्रेंच आवृत्तीचा कार्यभार सांभाळत असत. मीरा रिचर्ड्स या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारीदेखील सांभाळत असत.]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…