१९१४ मध्ये जेव्हा श्रीअरविंदांनी ‘आर्य’ मासिकासाठी लिखाण करावयास सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट. ते जे लिखाण करीत असत त्याला मानसिक ज्ञान किंवा मनोनिर्मिती असे म्हणता येणार नाही.
श्रीअरविंद मन निश्चल करून, टंकलेखनयंत्रासमोर बसत असत. आणि उच्च स्तरावरून जे त्यांच्यामध्ये प्रवाहित होत असे ते त्यांच्या टंकलेखन करणाऱ्या बोटांच्या माध्यमातून थेट कागदावर उमटत असे. अशा मानसिक निश्चल स्थितीमध्ये ‘आर्य’साठी ते पानेच्या पाने एकटाकी पद्धतीने टंकलिखित करीत असत.
अशा रीतीने १९१४ ते १९२१ या कालावधीत श्रीअरविंदांनी टंकलिखित केलेले सर्व प्रमुख लिखाण ‘आर्य’ या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. The Life Divine, The Human Cycle, The Ideal of Human Unity, Essays on the Gita, The Secret of the Veda, The foundation of Indian Culture ग्रंथसंपदा त्यांनी ह्याच काळात लिहिलेली आहे. ‘Synthesis of Yoga’ हा ग्रंथही ‘आर्य’ मधूनच प्रथम क्रमश: प्रकाशित झाला.
(Stories told by the Mother 11: Page 31)
*
[या काळात मीरा रिचर्ड्स (श्रीमाताजी) व त्यांचे पती पॉल रिचर्ड्स असे दोघे मिळून आर्य मासिकाच्या फ्रेंच आवृत्तीचा कार्यभार सांभाळत असत. मीरा रिचर्ड्स या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारीदेखील सांभाळत असत.]
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…