पाश्चिमात्य बुद्धीला परिचित असलेल्या कोणत्याही व्याख्येने ‘भारतीय धर्मा’चे वर्णन करता येत नाही. समग्रतेने विचार केला तर, भारतीय धर्म हा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक पूजाअर्चा व अनुभूतींचा सहिष्णू व मुक्त असा समन्वय आहे. एकमेव सत्याकडे हा धर्म सर्व बाजूंनी पाहतो आणि सत्याची कोणतीच बाजू तो त्याज्य मानीत नाही.
या धर्माने स्वतःला कोणतेच विशेष नाव दिले नाही, कोणत्याच मर्यादा घालणाऱ्या वैशिष्ट्याने स्वतःला बांधून घेतले नाही. या धर्मामध्ये जे घटक पंथ, विभाग आहेत त्यांना विभिन्न नावे धारण करावयास त्याने संमती दिली पण ज्या ब्रह्माचा युगानुयुगे तो शोध लावू पाहत आहे त्या ब्रह्माप्रमाणेच तो स्वत: मात्र अनाम, निराकार, विश्वव्यापी व अनंत राहिला आहे.
इतर संप्रदायांपासून वेगळेपणाने ओळखू येतील असे ह्या धर्माला पारंपरिक धर्मग्रंथ आहेत, संस्कार आहेत, प्रतीके आहेत, पण मूलत: त्याच्या अवश्यभावी गुणधर्मानुसार तो एक सांप्रदायिक धर्म नसून, ती एक व्यापक, बहुआयामी, नित्य संघटनशील, नित्य प्रगतिशील, आत्मसंवर्धक अशी आध्यात्मिक संस्कृतीची व्यवस्था आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…