श्रीमती सविता हिंदोचा नावाच्या एक साधिका तेव्हा केनियामध्ये राहत असत. त्यांच्या घरी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांचे काही साधक एकत्र जमले होते. त्यांनी प्रार्थना, ध्यान आणि वाचन सुरु केले. तेव्हा ते श्रीअरविंदांच्या ‘सावित्री’ या महाकाव्यातील उताऱ्याचे वाचन करत होते.
सविता म्हणतात, “मी भारावून गेले होते आणि मला असे जाणवू लागले की, मला ते काव्य समजावे म्हणून खुद्द माताजीच मला ते वाचून दाखवत आहेत…” आणि ह्या अनुभवानंतर पुढे एके दिवशी हिंदोचा यांनी सर्वसामान्य जीवन मागे सोडून द्यावयाचे असा निश्चय केला. आणि मग सुरु झाली प्रार्थनांची मालिका!
श्रीमाताजींना भेटण्यासाठी त्या व्याकुळ झाल्या. त्यांची खात्री पटली की, संपत्ती, कुटुंब, भौतिक आनंद, समृद्धी ह्या कशाकशातूनच दिव्य शांती आणि समाधान त्यांना मिळू शकणार नाही, आणि मग एक दिवस त्या आश्रमात येऊन दाखल झाल्या. श्रीमाताजींनी त्यांना हुता (सर्वस्व-दान केलेली) असे नाव दिले.
आश्रमात राहू लागल्यावर त्यांनी एकदा श्रीमाताजींना विचारले, “मी कोणत्या वेळी प्रार्थना करू म्हणजे मी तुमच्या सोबत प्रार्थना करू शकेन?” तेव्हा श्रीमाताजींनी त्यांना उत्तर दिले,
“प्रार्थना किंवा ध्यानासाठी माझी ठरावीक अशी कोणती वेळ नाही. वरवर पाहता हा देह काहीतरी काम करताना दिसत असला तरी मी दिवसरात्र सातत्याने परमपुरुषाला आवाहन करत असते. या असत्यमय जगामध्ये ते परमसत्य आणि ह्या बेबनावाने भरलेल्या जगामध्ये परमप्रेम आविष्कृत व्हावे म्हणून प्रार्थना करत असते. तेव्हा तुला जेव्हा प्रार्थना करावीशी वाटेल तेव्हा तू कर; तुला आढळेल की, तुझी प्रार्थना माझ्यासमवेतच झालेली आहे.”
– आधार : (On The Mother by K.R.Srinivasa lyengar)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…