ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: संस्मरण

तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही

श्रीअरविंद भारतात आल्यानंतर, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. ‘इंदुप्रकाश’मध्ये त्यावर टीका करणारी “New Lamps for Old” ही लेखमाला त्यांनी लिहिली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते; त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे!

तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्या. महादेव गोविंद रानडे यांनी “असे जहाल लिखाण लिहू नये,”असे संपादकांना सांगितले. तसे प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा श्रीअरविंदांनी राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. तरीही शासनाची त्यांच्यावर वक्र दृष्टी राहिलीच.

‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये श्रीअरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. श्रीअरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले, तेव्हा ते स्वतःच पोलिसांना शरण गेले.

या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले श्रीअरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लो.टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे, ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि.०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात रवीन्द्रनाथ टागोरांनी श्रीअरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली.

श्रीअरविंदांच्या विरुद्ध कोणताही आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे पुढे, त्यांची निर्दोष सुटका झाली. तेव्हा रवीन्द्रनाथ टागोर त्यांना भेटण्यास गेले आणि चेष्टेत म्हणाले, “काय हे? तुम्ही तर आम्हाला फसविलेत.”

तेव्हा श्रीअरविंद हसून म्हणाले, “तुम्हाला त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.” आणि खरोखर, पुढे लवकरच म्हणजे ०२ मे १९०८ मध्ये श्रीअरविंदांना परत अटक करण्यात आली.

(Sri Aurobindo-a biography and a history by K.R.Srinivasa Iyengar)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

45 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago