Entries by श्रीमाताजी

अहंकार निर्मूलनासाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो. (अहंकाराचे उच्चाटन करण्याचा) एक अवघड पण चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अहंकाराचे रूपांतरण करायचे आणि त्याला ईश्वराचे साधन बनवायचे. अहंकार रूपांतरित होऊन, तो जर ईश्वराला समग्रतया समर्पित झाला, तर तो अतिशय सशक्त आणि परिणामकारक साधन बनू शकतो. हा प्रयत्न […]

प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका

  मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो रूपांतरणाचा निर्णय कदापिही घेणार नाही. कारण तो स्वतःवरच खूष असतो. आणि एवढेच नाही तर तो, मनाचा साथीदार असल्यामुळे, तो जे काही करतो तेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करणारी स्पष्टीकरणं मनाद्वारे पुरविली जातात. जी माणसं प्राणिक चेतनेमध्ये जीवन जगत असतात […]

प्रामाणिक साधना व त्यातून मिळणारे संरक्षण

  (साधकाला जर जादुटोणा वगैरे गोष्टींचा धोका असेल तर काय करावे, अशा आशयाचा प्रश्न एका साधकाने विचारलेला दिसतो. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…) तुम्ही जोवर शक्तिशाली असता, अगदी विशुद्ध स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआप त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर […]

प्रामाणिकपणाची परीक्षा

‘आम्हाला विरोधी शक्ती त्रास का देतात आणि त्यांना आमच्या प्रगतीमध्ये अशी ढवळाढावळ करण्याचा अधिकार कोणी दिला?’ असा प्रश्न साधक मला नेहमी विचारत असतात. मी त्यांना सांगते की, ती त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते आणि ती आवश्यक असते. • श्रीमाताजी (CWM 04 : 353)

हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.‌

तुम्ही जर अगदी तळमळीने ईश्वराला म्हणाल, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ईश्वर अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल. तुमच्या अस्तित्वातील कोणतातरी एखादा भाग जेव्हा म्हणतो की, ‘हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.‌’ अशा वेळी तुमच्या त्या अभीप्सेमुळे काय होते? तर, तो तुम्हाला त्याचे अस्तित्व कळू देणार नाही, तो तुम्हाला […]

प्रामाणिक अभीप्सेचा परिस्थितीवर होणारा परिणाम

तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या अभीप्सेला साहाय्यक ठरतील अशा रितीनेच रचल्या जातील. त्या तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतील म्हणजे, एकतर एखाद्या नवीन गोष्टीशी त्या तुमचा संपर्क साधून देतील किंवा तुमच्या प्रकृतीमधील जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी एखादी गोष्ट त्या […]

प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक अनुभव

व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात. ते (मनाने) अद्भुत अनुभव रचतात आणि त्यांना तसे अनुभव खरोखरच आले आहेत, अशी कल्पना ते करू लागतात. परंतु जी माणसं प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात (त्यांच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) तर जेव्हा त्यांना ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती […]

ईश्वरासाठी जीवन जगणे

व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या मोबदल्यात कोणत्याही वैयक्तिक फलाची अपेक्षा न बाळगणे; हे असे जीवन जगणे म्हणजे ईश्वरासाठी जीवन जगणे. प्रारंभी, म्हणजे जेव्हा ईश्वर हा व्यक्तीच्या दृष्टीने केवळ एक शब्द असतो किंवा ईश्वर म्हणजे नुसती एक कल्पना असते, ईश्वराचा तिला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो तेव्हा […]

प्रामाणिकपणाचा विकास

  साधक : मी कोणती गोष्ट सर्वाधिक विकसित केली पाहिजे? आणि मी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला नकार देण्याची गरज आहे? श्रीमाताजी : प्रामाणिकपणा विकसित करा. प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराच्या मार्गाशी समग्र निष्ठा बाळगणे. जुन्या मानवी सवयींकडे आपला ओढा असतो, त्याला नकार द्या. * साधक : मला वैयक्तिकरित्या श्रीअरविंदांना एक सर्वोत्तम गोष्ट अर्पण करायची आहे. मी काय […]

पूर्णयोगाचा पाया

  प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य पाया आहे. हे प्राथमिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाही. – श्रीमाताजी (CWM 13 : 123)