Entries by श्रीमाताजी

खरी समस्या

तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय, वासनाविकार इ.) नको असते, त्या अडचणीवर मात करण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असते, पण तुमच्या चेतनेच्या इतर घटकांमध्ये ज्या असंख्य गतिविधी चाललेल्या असतात त्याविषयी तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ असता; ही खरी समस्या असते. तुम्ही म्हणत असता की, “मला त्यापासून सुटका हवी आहे.” […]

दृढ निश्चयातून बदल

  (बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते आपण कालच्या भागात पाहिले.) तुमची अभीप्सा जेव्हा क्षीण होते, प्रयत्न मंदावतात तेव्हा तुमच्यामधील बदलास नाखूष असणारा हा घटक गाजावाजा न करता पण पटकन उसळी मारून वर येतो. तो त्याची इच्छा तुमच्यावर लादू पाहतो आणि तुम्हाला जे करायचे […]

बदलास नाखूष असणारा घटक

(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण श्रीमाताजी समजावून सांगत आहेत.) व्यक्तीमध्ये एखादा घटक असा असतो की, त्याच्यामध्ये अभीप्सा असते, तो ईश्वराप्रत समर्पित असतो आणि त्याचवेळी त्या व्यक्तीमध्ये इतर काही घटक असे असतात – कधीकधी एखादा छोटासाच घटक असतो, तर कधीकधी मोठाही असू शकतो – तो तळाशी, […]

अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर

  साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते? श्रीमाताजी : सोपे आहे हे समजायला. कल्पना करा की, तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि आता तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, ईश्वरी कृपेवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर खरोखरच तिच्यावर विसंबून राहिलात तर, तुम्हाला अचानक असे जाणवेल […]

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०३

  (श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.) मुलांना एक गोष्ट अवश्य शिकवावी असे माझे पालकांना आणि शिक्षकांना सांगणे आहे. मुलांना असे सांगावे की, ‘’मुलांनी ते चांगले आहेत असे ‘दाखविणे‌’, जणू काही ते फार आज्ञाधारक आहेत असे ‘दाखविणे‌’ किंवा ते खूप उत्तम रितीने अभ्यास करत आहेत असे ‘दाखविणे‌’ हे […]

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०२

(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. आपण कालच्या भागात त्याचा विचार केला.) काही व्यक्ती वर नमूद केलेल्या नियमाला अपवाद असतात, असे समजू नका. कारण (जडत्व, आळस, अज्ञान, नैराश्य, नकारात्मक विचार इ.) प्राकृतिक स्वभावधर्माचा भाग वाट्यालाच आला नाही, अशा रितीने कोणीही या भौतिक जगात राहू […]

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०१

“बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम विजयाबद्दल खात्री बाळगली पाहिजे. त्याने ध्येय संपादन करण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि सातत्यपूर्ण प्रगतीची शक्यता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.” मी निरपवाद प्रामाणिकपणावर एवढा भर का देत असते? ते तुम्हाला सांगते. तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही लहान […]

आत्मवंचना आणि जागता पहारा

साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे हजार मार्ग असतात. मग अशा वेळी व्यक्तीने तिचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची? श्रीमाताजी : सावकाशपणे करायचे हे एक दीर्घकालीन कार्य आहे. व्यक्तीमध्ये जर परिपूर्ण प्रामाणिकपणा असेल तरच हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने […]

अप्रामाणिकपणाची खूण

  व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो. * आंतरिक संघर्ष ही प्रामाणिकपणाच्या अभावाची खूण असते. – श्रीमाताजी (CWM 14 : 68, 69)

प्रामाणिकपणा आणि ईश्वरी साहाय्य

ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल अशा वेळी, तिने जर अगदी प्रामाणिकपणे ईश्वराला आवाहन केले आणि त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा केली तर, व्यक्तीला त्याच्याकडून नेहमीच प्रतिसाद मिळतो. मात्र एकीकडे आवाहन करायचे आणि त्याच वेळी दुसरीकडे, “आता मी ईश्वराला आवाहन तर केले आहे, पण तो प्रतिसाद देतोय का […]