Entries by श्रीमाताजी

दुरिच्छेचे दुष्परिणाम

  तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य आणि मिथ्यत्व यातील फरकच कळेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांना तो सत्य मानतो. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःची अभीप्सा गमावून बसतो, तो साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. ज्ञान, संवेदना आणि […]

दुर्वर्तनी मनुष्य आणि प्रामाणिकपणा

  (आंतरिक धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन म्हणजे यातनाघरच कसे असते, ते श्रीमाताजींनी सांगितले. आपण तो मुद्दा कालच्या भागात विचारात घेतला. आता, अशा दुराचारी व्यक्तीच्या बाबतीत प्रामाणिकपणाचा काय उपयोग होतो, ते श्रीमाताजी स्पष्ट करत आहेत.) आंतरिक धर्माचे पालन न करणारा मनुष्य जी कोणती गोष्ट करू पाहील त्यात त्याला यश मिळणारच नाही, असे नाही. तो […]

निरय संकल्पनेचा खरा अर्थ

  (आंतरिक धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे आपण कालच्या भागात पाहिले. श्रीमाताजी आता येथे बौद्धमतामधील ‘निरय’ या शब्दाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहेत.) व्यक्तीने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल, तिला जिथे शिक्षा केली जाते ती जागा म्हणजे एक प्रकारचा नरक, असा बौद्धमतातील ‘निरय‌’ (Niraya) या संकल्पनेचा प्रचलित अर्थ होतो. परंतु त्याचा अन्यही […]

आंतरिक धर्म

मनुष्यामध्ये असणारी ईश्वरी उपस्थिती हे प्रत्येक व्यक्तीचे सत्य असते, तो व्यक्तीचा आंतरिक धर्म (inner law) असतो. आणि हा आंतरिक धर्मच तिच्या जीवनाचा स्वामी आणि मार्गदर्शक असला पाहिजे. तुम्ही जेव्हा या आंतरिक धर्माचे म्हणणे शिरसावंद्य मानण्याची सवय लावून घेता, जेव्हा तुम्ही त्याचे पालन करता, जेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करता, त्या धर्माने तुमच्या जीवनाला मार्गदर्शन करावे असा […]

चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद

(आपल्या चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद याची आपल्याला जाणीव नसते याविषयी श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण पाहिले.) चेतनेचा एक घटक म्हणत असतो की, “नाही, अमुक एक गोष्ट मला नकोय.” पण त्याच्यामागे अनेक घटकांचा एक ढिगाराच जणू काही लपून बसलेला असतो. आणि तो मात्र त्याविषयी काहीच म्हणत नाही, तो ढिगारा स्वतःचे अस्तित्वसुद्धा […]

अडचण दूर करण्याचा उपाय

(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण समजावून घेतले.) तुमच्यामध्ये समजा एखादा दोष आहे आणि तो तुम्ही दूर करू इच्छित आहात पण तरीही तो जर टिकून राहिला आणि तुम्ही म्हणालात की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले […]

खरी समस्या

तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय, वासनाविकार इ.) नको असते, त्या अडचणीवर मात करण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असते, पण तुमच्या चेतनेच्या इतर घटकांमध्ये ज्या असंख्य गतिविधी चाललेल्या असतात त्याविषयी तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ असता; ही खरी समस्या असते. तुम्ही म्हणत असता की, “मला त्यापासून सुटका हवी आहे.” […]

दृढ निश्चयातून बदल

  (बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते आपण कालच्या भागात पाहिले.) तुमची अभीप्सा जेव्हा क्षीण होते, प्रयत्न मंदावतात तेव्हा तुमच्यामधील बदलास नाखूष असणारा हा घटक गाजावाजा न करता पण पटकन उसळी मारून वर येतो. तो त्याची इच्छा तुमच्यावर लादू पाहतो आणि तुम्हाला जे करायचे […]

बदलास नाखूष असणारा घटक

(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण श्रीमाताजी समजावून सांगत आहेत.) व्यक्तीमध्ये एखादा घटक असा असतो की, त्याच्यामध्ये अभीप्सा असते, तो ईश्वराप्रत समर्पित असतो आणि त्याचवेळी त्या व्यक्तीमध्ये इतर काही घटक असे असतात – कधीकधी एखादा छोटासाच घटक असतो, तर कधीकधी मोठाही असू शकतो – तो तळाशी, […]

अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर

  साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते? श्रीमाताजी : सोपे आहे हे समजायला. कल्पना करा की, तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि आता तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, ईश्वरी कृपेवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर खरोखरच तिच्यावर विसंबून राहिलात तर, तुम्हाला अचानक असे जाणवेल […]