ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

बुद्धीचा अडथळा?, नव्हे, साहाय्य

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार नाही असे तुम्हाला का वाटते? व्यक्ती ज्याप्रमाणे प्राणाद्वारे, भावनिक अस्तित्वाद्वारे, शरीराद्वारे ईश्वरी शक्तीचे ग्रहण करू शकते, तशीच ती विचारी मनाच्या माध्यमातूनसुद्धा शक्तीचे ग्रहण करू शकते. विचारी मनदेखील प्राण आणि शरीराइतकेच सक्षम असते. अस्तित्वाच्या इतर घटकांप्रमाणेच विचारी मनाचेसुद्धा रूपांतरण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्याला ईश्वरी शक्ती कशी ग्रहण करायची याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. ते दिले गेले नाही तर विचारी मनाचे रूपांतरण शक्य होणार नाही.

शरीराची तामसिकतेने झाकोळलेली, मूढ, बाधक असणारी चेतना ही जशी आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते किंवा प्राणाची सुसंस्कारित न झालेली सामान्य कृती ही जशी अडथळा ठरते; अगदी त्याचप्रमाणे बुद्धीची अज्ञानग्रस्त कृती ही देखील आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते. त्यामुळे साधकाला पुढील गोष्टींची जाणीव असली पाहिजे.

• पहिली गोष्ट म्हणजे त्याने मानसिक संकल्पना किंवा संस्कार किंवा बौद्धिक निष्कर्ष या गोष्टींना साक्षात्कार समजण्याची चूक करता कामा नये.

• दुसरी गोष्ट म्हणजे मनाची चंचलता, अस्वस्थता. त्यामुळे आंतरात्मिक (psychic) आणि आध्यात्मिक (spiritual) अनुभवाच्या उत्स्फूर्त अचूकतेमध्ये बाधा निर्माण होते. आणि त्यामुळे प्रकाशित करणाऱ्या खऱ्या ज्ञानाच्या अवतरणाला वावच दिला जात नाही किंवा मग, या ज्ञानाचा मानवी मानसिक स्तराला स्पर्श झाल्याबरोबर किंवा पूर्णपणे तो स्पर्श होण्याआधीच, त्या ज्ञानामध्ये विकार निर्माण होतो. (म्हणून या गोष्टी घडू नयेत यासाठी साधकाने खबरदारी घेतली पाहिजे.)

…बुद्धी जर समर्पित झाली; ती जर खुली, अविचल, ग्रहणशील झाली तर, ती प्रकाश ग्रहण करण्याचे माध्यम किंवा आध्यात्मिक अवस्थेच्या अनुभवाला व आंतरिक परिवर्तनाच्या पूर्णतेला साहाय्यक का बरे होऊ शकणार नाही?

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13-14)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

ईश्वरी शक्तीचा पक्ष

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच…

2 days ago

आध्यात्मिक साक्षात्काराचा एक नवीन आयाम

  (मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी…

3 days ago

सर्व अडचणींचे मूळ

(श्रीमाताजींनी माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील जो उपाय सांगितला तो आपण कालच्या भागात विचारात घेतला. त्या विवेचनाचा हा…

4 days ago

चेतनेचे परिवर्तन

(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग...) आता…

5 days ago

मनुष्याकडे असणारी अद्भुत क्षमता

  (मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो…

6 days ago

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

7 days ago