(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, हे अगदी खरे आहे. आणि म्हणूनच, तुम्ही स्वतःसाठी जे करू शकत नाही ते तुमच्यासाठी केले जावे यासाठी, तुम्ही ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या संपर्कात आले पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे त्या ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करण्यास वाव दिला पाहिजे तसेच तुम्ही (विरोधी शक्तीची बाजू न घेता) ईश्वरी शक्तीच्या पक्षात राहिले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमची तिच्यावर श्रद्धा असली पाहिजे, तुम्ही तिच्यावर विसंबून राहिले पाहिजे. स्वतःला उगाचच कष्टविता कामा नये. तिचे अविचलपणे स्मरण करत राहिले पाहिजे, अविचलपणे तिला आवाहन केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे विचलित न होता, तिला तुमच्यामध्ये तिचे कार्य करू दिले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर, बाकी साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातील. अर्थात सर्व गोष्टी एकदमच केल्या जातील असे नाही, कारण त्यापूर्वी मार्गातील बऱ्याच अडचणी दूर करणे आवश्यक असते; पण तरीही आवश्यक ते सारे काही सुस्थिरपणाने आणि चढत्या वाढत्या प्रमाणात केले जाईल, (याची खात्री बाळगा.)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 188)
(मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी…
(श्रीमाताजींनी माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील जो उपाय सांगितला तो आपण कालच्या भागात विचारात घेतला. त्या विवेचनाचा हा…
(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग...) आता…
(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो…
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…