(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, हे अगदी खरे आहे. आणि म्हणूनच, तुम्ही स्वतःसाठी जे करू शकत नाही ते तुमच्यासाठी केले जावे यासाठी, तुम्ही ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या संपर्कात आले पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे त्या ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करण्यास वाव दिला पाहिजे तसेच तुम्ही (विरोधी शक्तीची बाजू न घेता) ईश्वरी शक्तीच्या पक्षात राहिले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमची तिच्यावर श्रद्धा असली पाहिजे, तुम्ही तिच्यावर विसंबून राहिले पाहिजे. स्वतःला उगाचच कष्टविता कामा नये. तिचे अविचलपणे स्मरण करत राहिले पाहिजे, अविचलपणे तिला आवाहन केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे विचलित न होता, तिला तुमच्यामध्ये तिचे कार्य करू दिले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर, बाकी साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातील. अर्थात सर्व गोष्टी एकदमच केल्या जातील असे नाही, कारण त्यापूर्वी मार्गातील बऱ्याच अडचणी दूर करणे आवश्यक असते; पण तरीही आवश्यक ते सारे काही सुस्थिरपणाने आणि चढत्या वाढत्या प्रमाणात केले जाईल, (याची खात्री बाळगा.)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 188)
(चैत्य दृष्टिकोनातून माणसापेक्षा एखादे गुलाबाचे फुलदेखील किती चांगले असू शकते ते श्रीमाताजींनी सांगितले, हे आपण…
आंतरात्मिक चेतनेच्या अनेकविध सुंदर रूपांमधील नि:स्वार्थी, निरपेक्ष कृती हे या जगातील एक सर्वोत्तम रूप आहे.…
‘सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि फक्त ईश्वराप्रति अभिमुख होण्याची इच्छा या गोष्टी म्हणजे चैत्य पुरुष…
मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही)…
पूर्णयोगासाठी व्यक्तीची तयारी असणे याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ 'पूर्णयोगाची क्षमता असणे’ असा नसून…
तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्या'चा शोध घेण्याची आणि त्या ‘सत्या’चे…