जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी असता कामा नये, तिने आपल्या परम उगमापासून विभक्त होऊन, स्व-मग्न होता कामा नये; तिने अहंभावाचे समूळ उच्चाटन केलेच पाहिजे आणि याचीच खरी आवश्यकता असते. तेव्हाच व्यक्तीला जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे हे ज्ञात होऊ शकते. तिथपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. एखाद्या निरूपयोगी वस्त्राप्रमाणे, व्यक्तीचा अहंभाव गळून पडला पाहिजे आणि यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते किती सार्थ आहेत हे त्यांच्या परिणामावरून लक्षात येते.
आणि मग व्यक्ती या मार्गावर एकाकी नसते. (मी या मार्गावर एकाकी, एकटी नाही असा) विश्वास जर व्यक्तीमध्ये असेल तर, तिला साहाय्य मिळत राहते. तुम्ही एक क्षणभर जरी ईश्वरी कृपेच्या संपर्कात आलात तर ती कृपा, तुम्हाला तिच्यासोबत घेऊन जाते, त्या मार्गावरून तुमची वाटचाल द्रुतगतीने घडवून आणते. त्वरा केली पाहिजे याची तुम्हाला आठवणसुद्धा राहत नाही इतक्या सहजस्वाभाविक रितीने ती ते सारे घडवून आणते. तुमचा क्षणभर जरी त्या ईश्वरी कृपेशी संपर्क आला असेल तर, ती गोष्ट विस्मरणात जाऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. मग तेव्हा एखाद्या बालकाच्या निर्व्याज साधेपणाने, निष्पापपणाने म्हणजे ज्यामध्ये कोणतीही जटिलता नसते अशा निष्पापपणाने तुम्ही त्या ईश्वरी कृपेस आत्मदान करा आणि ईश्वरी कृपेनेच सारे काही करावे यासाठी तिच्याप्रत खुले व्हा.
प्रतिकार करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्यामध्ये एक सच्चा, खराखुरा विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कोणताही हिशोब न करता, कोणतीही सौदेबाजी (bargaining) न करता, स्वतःचे आत्मदान करण्यास प्रवूत्त होता असा विश्वास तुमच्या ठायी असला पाहिजे. विश्वास ठेवा. मग त्या विश्वासापोटी तुम्ही ईश्वराला असे म्हणता की, “मी ही गोष्ट तुझ्यावर सोपवितो आहे. माझ्यासाठी तेवढे करशील ना?” आणि हाच सर्वोत्तम मार्ग असतो.
– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)
(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास…
बरेचदा असे होते की, व्यक्ती आत्मशोधासाठी, आत्म्याशी ऐक्य पावण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आंतरिक प्रयत्न…
निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला…
जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वराचे अपयश असते. परंतु त्यामुळे…
जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…