ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: जीवनऋतू

दुर्दैवी परिस्थिती वाट्याला आली तर…

(कंटाळा आला तर त्याचा प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण कालच्या भागात पाहिले. त्याचा हा उत्तरार्ध…)

जीवनाकडून जेव्हा तुम्हाला एखादा जबरदस्त दणका बसतो, ज्याला लोकं दुर्दैव असं म्हणतात, त्या परिस्थितीत व्यक्ती प्रथम काय करते? तर, ती परिस्थिती विसरण्याचा व्यक्ती प्रयत्न करते. वाट्याला आलेल्या परिस्थितीचा विसर पडावा म्हणून ती हर तऱ्हेच्या गोष्टी करत राहते. जेव्हा एखादी गोष्ट अगदी दुःखद असते तेव्हा ती स्वत:चे लक्ष दुसरीकडे वळवू पाहते आणि त्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी करत राहते. अशी व्यक्ती चेतना उन्नत करण्याऐवजी चेतना निम्न पातळीवर उतरवते.

तुमच्याबाबतीत जर एखादी अत्यंत क्लेशदायक गोष्ट घडली तर तेव्हा नुसते सुन्न होऊन बसू नका आणि अचेतनेच्या गर्तेमध्ये जाऊ नका, तर ते दु:ख विसरण्याऐवजी, त्या दुःखाच्या थेट मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तेथे, त्या दुःखाच्या पाठीमागे दडून असलेल्या प्रकाश, सत्य, सामर्थ्य आणि हर्ष या गोष्टी सापडतील. परंतु त्यासाठी तुम्ही दृढ राहिले पाहिजे आणि तुमची घसरण होऊ देता कामा नये.

अशा प्रकारे, जीवनातील प्रत्येक घटना, मग ती लहान असो की मोठी, प्रगती करण्याची ती एक उत्तम संधी ठरू शकते. एवढेच काय पण, घटनांचा लाभ कसा करून घ्यायचा हे तुम्हाला माहीत असेल तर जीवनातील अगदी बारीकसारीक गोष्टसुद्धा तुम्हाला अगदी साक्षात्कारपर्यंत घेऊन जाऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

 

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

कंटाळ्यावरील उपाय

  व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा…

1 day ago

एक अक्षय्य ऊर्जास्रोत – भाग ०२

  (आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या…

2 days ago

एक अनोखा ऊर्जास्रोत

  (पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी…

3 days ago

तारुण्य आणि वार्धक्य

  तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि…

4 days ago

शाश्वत तारुण्याचा आश्रय

  श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला…

5 days ago

जगाची नवनिर्मिती तरुणच करतील

  भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे…

6 days ago