ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: जीवनऋतू

दुर्दैवी परिस्थिती वाट्याला आली तर…

(कंटाळा आला तर त्याचा प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण कालच्या भागात पाहिले. त्याचा हा उत्तरार्ध…)

जीवनाकडून जेव्हा तुम्हाला एखादा जबरदस्त दणका बसतो, ज्याला लोकं दुर्दैव असं म्हणतात, त्या परिस्थितीत व्यक्ती प्रथम काय करते? तर, ती परिस्थिती विसरण्याचा व्यक्ती प्रयत्न करते. वाट्याला आलेल्या परिस्थितीचा विसर पडावा म्हणून ती हर तऱ्हेच्या गोष्टी करत राहते. जेव्हा एखादी गोष्ट अगदी दुःखद असते तेव्हा ती स्वत:चे लक्ष दुसरीकडे वळवू पाहते आणि त्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी करत राहते. अशी व्यक्ती चेतना उन्नत करण्याऐवजी चेतना निम्न पातळीवर उतरवते.

तुमच्याबाबतीत जर एखादी अत्यंत क्लेशदायक गोष्ट घडली तर तेव्हा नुसते सुन्न होऊन बसू नका आणि अचेतनेच्या गर्तेमध्ये जाऊ नका, तर ते दु:ख विसरण्याऐवजी, त्या दुःखाच्या थेट मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तेथे, त्या दुःखाच्या पाठीमागे दडून असलेल्या प्रकाश, सत्य, सामर्थ्य आणि हर्ष या गोष्टी सापडतील. परंतु त्यासाठी तुम्ही दृढ राहिले पाहिजे आणि तुमची घसरण होऊ देता कामा नये.

अशा प्रकारे, जीवनातील प्रत्येक घटना, मग ती लहान असो की मोठी, प्रगती करण्याची ती एक उत्तम संधी ठरू शकते. एवढेच काय पण, घटनांचा लाभ कसा करून घ्यायचा हे तुम्हाला माहीत असेल तर जीवनातील अगदी बारीकसारीक गोष्टसुद्धा तुम्हाला अगदी साक्षात्कारपर्यंत घेऊन जाऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

 

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

ईश्वरी अवतरणाचा दाब

  (अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत...) तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा…

12 hours ago

चालत्या गाड्याला खीळ…

  “तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात…

2 days ago

प्रकृतीचे शुद्धीकरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…

3 days ago

अडचणींना कसे हाताळावे?

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…

4 days ago

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…

5 days ago

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

6 days ago