साधक : मी कोणती गोष्ट सर्वाधिक विकसित केली पाहिजे? आणि मी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला नकार देण्याची गरज आहे?
श्रीमाताजी : प्रामाणिकपणा विकसित करा. प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराच्या मार्गाशी समग्र निष्ठा बाळगणे. जुन्या मानवी सवयींकडे आपला ओढा असतो, त्याला नकार द्या.
*
साधक : मला वैयक्तिकरित्या श्रीअरविंदांना एक सर्वोत्तम गोष्ट अर्पण करायची आहे. मी काय अर्पण करू?
श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा.
साधक : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत मला सांगाल का?
श्रीमाताजी : तुम्ही ज्या वेळी शांतचित्त असू शकाल अशी दिवसभरातील कोणतीही एक वेळ निश्चित करा. श्रीअरविंदांचे एखादे पुस्तक घ्या आणि त्यातील एक किंवा दोन वाक्यं वाचा. मग निश्चल-नीरव राहून, त्या वाक्यांमधील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी एकाग्रचित्त व्हा. मानसिक निश्चल-नीरवता मिळविण्यासाठी पुरेसे खोलवर जाऊन एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा आणि जोवर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत याची रोज पुन्हा नव्याने सुरूवात करा.
– श्रीमाताजी (CWM 14 : 67), (CWM 12 : 205)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…