ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल अशा वेळी, तिने जर अगदी प्रामाणिकपणे ईश्वराला आवाहन केले आणि त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा केली तर, व्यक्तीला त्याच्याकडून नेहमीच प्रतिसाद मिळतो. मात्र एकीकडे आवाहन करायचे आणि त्याच वेळी दुसरीकडे, “आता मी ईश्वराला आवाहन तर केले आहे, पण तो प्रतिसाद देतोय का पाहू या,” असे म्हणायचे, (बरेच जणं असं करतात.) पण अर्थातच ही गोष्ट काही योग्य नाही. व्यक्ती जर मन निश्चल-निरव करू शकली आणि ती थोडी जरी शांत झाली तर, ईश्वरी साहाय्य मिळत आहे हे तिला संवेदित होते. एवढेच नव्हे तर, ते साहाय्य कोणत्या रूपात मिळणार आहे तेही तिला संवेदित होते.
*
ढोंग आणि नाटकीपणाचा महासागर असण्यापेक्षा, प्रामाणिकपणाचा एक थेंब हा शाश्वत चेतनेच्या दृष्टीने कितीतरी अधिक मौल्यवान असतो.
– श्रीमाताजी (CWM 05 : 370-371) & (CWM 12 : 129)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…