श्री अरविंद एक आठवण सांगत आहेत…
वीस वर्षांपूर्वी नेव्हिनसन (१९०७ साली झालेल्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले एक ब्रिटिश पत्रकार) यांनी घाबरून जाऊन माझ्याविषयी एक विधान केले होते, “भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष – कधीही न हसणारा माणूस.” त्यांनी त्यामध्ये एका वाक्याची भर घालायला हवी होती, “जो नेहमी हास्यविनोद करत असतो.” पण माझा हा पैलू त्यांना माहीत नव्हता कारण मी त्यांच्याबरोबर वावरताना नेहमीच गंभीर असे किंवा कदाचित तेव्हा माझी विनोदबुद्धी पुरेशी विकसित झाली नसेल.
श्रीअरविंद (CWSA 35 : 51)
*
(अमल किरण हे श्रीअरविंदांचे एक ज्येष्ठ अनुयायी होते. अमल यांची जडणघडण पाश्चात्त्य पद्धतीच्या शिक्षणाद्वारे झाली होती आणि त्यामुळे त्यांना पडणारे सर्व प्रश्न हे एक तर तात्त्विक असत नाहीतर साहित्यविषयक असत. अमल किरण येथे श्रीअरविंद यांच्याशी संबंधित एक प्रसंग कथन करत आहेत.)
एके दिवशी मी श्रीमाताजींना सांगितले की, “श्री अरविंद लिखित दिव्य जीवन हा ग्रंथ पुरेसा तार्किक नाहीये. त्या आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागल्या. आणि मला म्हणाल्या, “असे म्हणणारे तुम्ही पहिलेच गृहस्थ आहात.”
पुढे पहिल्या दर्शनाच्या वेळी मी जेव्हा श्रीअरविंदाच्या समोर उभा होतो तेव्हा माताजींनी तो प्रसंग श्रीअरविंदांना सांगितला. त्या म्हणाल्या, “अमल किरण काय म्हणत आहेत ते ऐकलेत का?” माझे म्हणणे मी श्रीअरविंदांसमोर मांडले. ते ऐकल्यावर श्रीअरविंद यांनी अस्फुट स्मित केले आणि संमतीदर्शक मान हलवली. ती त्यांची पद्धतच होती. ते फारसे बोलत नसत किंवा फारसे व्यक्तही होत
नसत.
आधारित (Light and laughter by Amal Kiran : 14)
*
ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत…
(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित 'सावित्री' या महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती.…
श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या…
मुलं लहान असताना त्यांच्या मनामध्ये हे जग सुंदर करण्याची एक स्वाभाविक प्रेरणा असते, ऊर्मी असते.…
कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा…
माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती.…