श्रीमाताजी आणि समीपता – १९
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
साधक : श्रीमाताजींच्या नुसत्या दर्शनानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव (psychic feeling) आहे.
साधक : श्रीमाताजींच्या स्मरणानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.
साधक : श्रीमाताजींच्या विरोधात कोणी काही बोललेले ऐकले की काळजाला घरं पडतात, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.
साधक : श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या खूप दूर असूनसुद्धा, श्रीमाताजींचे अस्तित्व हृदयामध्ये अनुभवास येते, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.
साधक : मी आंतरात्मिक प्रेमाच्या पूर्ण स्थितीमध्ये आहे हे मला कसे जाणता येईल?
श्रीअरविंद : अहंकाराचे अस्तित्व नसणे, शुद्ध भक्ती, आणि ईश्वराप्रति शरणागतता आणि समर्पण यांद्वारे ते जाणून घेता येईल.
*
साधक : जेव्हा सारे काही स्थिर, आणि शांत असते तेव्हा मला माझ्या हृदयात खोलवर असे काहीतरी अनुभवास येते, अंतरंगातून सातत्याने सर्वांसाठी समानतेने एक प्रकारची अतिशय मधुर अशी भावना उचंबळून वर येते. आणि ती सातत्याने श्रीमाताजींपाशी जाऊन पोहोचते. ईश्वराबरोबर असलेल्या एका मधुर नात्याची जाणीव त्यामध्ये असते. त्यामुळे माझे संपूर्ण अस्तित्व अगदी मृदुमुलायम होऊन जाते; ते स्थिरचित्त, शांत, मधुर शांतीने आणि समाधानाने भरून जाते.
श्रीअरविंद : याला म्हणतात ‘आंतरात्मिक प्रेम’! (psychic love.)
– श्रीअरविंद (CWSA 32 : 466-467)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…