ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – २५९

साधना, योग आणि रूपांतरण – २५९

प्राणाचे रूपांतरण

पृथ्वी-चेतनेला परिवर्तन नको असते आणि त्यामुळे वरून जे काही अवतरित होते त्यास ती नकार देते. आत्तापर्यंत ती नेहमीच हे असे करत आली आहे. ज्यांनी योगाचे आचरण करण्यास सुरुवात केली आहे ते जर स्वतःस उन्मुख करतील आणि त्यांच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यास राजी होतील तरच पृथ्वी-चेतनेमधील ही अनिच्छा नाहीशा होऊ शकेल.

या परिवर्तनामध्ये कोणती गोष्ट आड येते? तर, प्राणिक अहंकार आणि त्याचे अज्ञान आणि त्याच्या अज्ञानाचा त्याला असणारा अभिमान ही गोष्ट आड येते. परिवर्तनाच्या कोणत्याही आवाहनास विरोध व प्रतिकार करणारी शारीरिक चेतना आणि तिचे जडत्व, आणि तिचा आळशीपणा, की ज्याची कोणतेही कष्ट घेण्याची तयारी नसते या गोष्टीसुद्धा परिवर्तनाच्या आड येतात. शारीर-चेतनेला त्याच त्याच जुन्या गतिविधी पुन्हा पुन्हा करत राहणे सोयीस्कर वाटते. ती जास्तीत जास्त काय करते तर, तिच्यासाठी कधीतरी कोणीतरी, कोणत्यातरी प्रकारे सर्वकाही करेल अशी ती अपेक्षा करत असते.

आणि म्हणूनच पहिली आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे तुमच्यापाशी योग्य असा आंतरिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि नंतर, स्वतःचे रूपांतरण करण्याची इच्छा असणे, आणि कनिष्ठ प्रकृतीचा तामसिक चिवटपणा व अहंकार यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन आणि त्याला नकार देण्यामधील सतर्कता या गोष्टी आवश्यक असतात. अंतिमतः, तुमचे व्यक्तित्व, त्याचा प्रत्येक भाग हा सदोदित श्रीमाताजींप्रत खुला असला पाहिजे; जेणेकरून रूपांतरणाच्या प्रकियेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 222)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago