साधना, योग आणि रूपांतरण – १९६
आपल्या दृष्टीने ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.
१) ज्यापासून आणि ज्यामध्ये या विश्वातील सर्वकाही आविष्कृत झाले आहे आणि (जरी हे आविष्करण सद्यस्थितीत अज्ञानगत असले तरीसुद्धा.) सर्व वस्तुंच्या आणि व्यक्तींच्या अंतरंगामध्ये आणि पाठीमागे असणारा ‘विश्वात्मा’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर.’
२) आपल्या अंतरंगामध्ये वसलेल्या स्वतःच्या अस्तित्वाचे ‘चैतन्य’ आणि त्याचा ‘स्वामी’ म्हणजे ‘ईश्वर’, की ज्याची आपण सेवा केली पाहिजे आणि आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला आपण शिकले पाहिजे, जेणेकरून आपण ‘अज्ञाना’मधून ‘प्रकाशा’कडे उन्नत होऊ शकू.
३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान व शक्ती आहे आणि त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या ‘प्रकाशा’कडे आपण उन्नत झाले पाहिजे आणि आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये आपण त्याची वास्तविकता अधिकाधिक उतरविली पाहिजे.
सामान्य प्रकृतीमध्ये आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ म्हणजे काय हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणूकाही एक पडदाच विणतात की ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गभीर (deeper) चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि जी ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल त्या ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे
‘ईश्वरा’बद्दलच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. चेतना खुली होण्यातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच, ‘ईश्वरा’च्या सत्याचा साक्षात्कार होणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…