साधना, योग आणि रूपांतरण – १५४
पूर्णयोगांतर्गत भक्ती
साधक : श्रीअरविंदांनी असे सांगितले आहे की, व्यक्ती मानवी प्रेमाकडून दिव्य प्रेमाकडे वळू शकते.
श्रीमाताजी : जे मानवी प्रेम ‘भक्ती’ म्हणून, ‘ईश्वर’विषयक भक्तीची ‘शक्ती’ म्हणून आविष्कृत होते त्या प्रेमाविषयी श्रीअरविंद सांगत होते. ते म्हणतात, सुरुवातीला ईश्वराबद्दलचे प्रेम हे अगदी मानवी स्तरावरील प्रेम असते, आणि त्यामध्ये मानवी प्रेमाची सर्व गुणवैशिष्ट्यं दिसून येतात. ती गुणवैशिष्ट्यंसुद्धा श्रीअरविंदांनी खूप चांगल्या रीतीने स्पष्ट केली आहेत. (भलेही तुमचे प्रेम सुरुवातीला मानवी स्तरावरील असेल पण जर) तुम्ही चिकाटी बाळगलीत आणि आवश्यक ते प्रयत्न केलेत तर, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्याशी एकात्म पावून त्यायोगे, मानवी स्तरावरील प्रेमाचे दिव्य प्रेमामध्ये रूपांतर करणे अशक्य मात्र नाही. दोन व्यक्तींमधील प्रेमाचे परिवर्तन ईश्वरी प्रेमामध्ये होऊ शकते, असे श्रीअरविंदांनी म्हटलेले नाही.
कोणा एका व्यक्तीने त्यांना भक्तीसंबंधी, साधकाला ‘ईश्वरा’बद्दल जे प्रेम असते त्याविषयी एकदा काही विचारले होते तेव्हा त्यांनी असे सांगितले होते की, सुरुवातीला तुमचे प्रेम हे पूर्णपणे मानवी स्तरावरील असते. ते तर असेही म्हणाले होते की, कधीकधी तर ते प्रेम अगदी व्यावहारिक देवाणघेवाण या प्रकारचेसुद्धा असते. परंतु तुम्ही जर प्रगती केलीत तर, तुमच्या प्रेमाचे ‘दिव्य’ प्रेमामध्ये, खऱ्या भक्तीमध्ये परिवर्तन होऊ शकते.
– श्रीमाताजी (CWM 06 : 174-175)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…