साधना, योग आणि रूपांतरण – १३६
‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमाद्वारे बाह्य जीवनव्यवहारामध्ये कार्य करता यावे यासाठी तुमच्यामध्ये खालील तीन गोष्टी असणे आवश्यक असते.
०१) ‘अविचलता, समता’ – म्हणजे घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त व दृढ ठेवणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टिकोनातून पाहूनसुद्धा स्वतः समचित्त राहणे.
०२) ‘निरतिशय श्रद्धा’ – म्हणजे जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल अशी श्रद्धा बाळगणे, पण त्याचबरोबर, व्यक्ती जर स्वतःला (ईश्वराचे) खरेखुरे साधन बनवू शकली तर, ‘कर्तव्यम् कर्म’ हे त्याचे आपल्याला मिळालेले फळ असेल अशी श्रद्धा त्या व्यक्तीने बाळगणे. ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या त्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म केले पाहिजे असे जाणवते ते कर्म म्हणजे ‘कर्तव्यम् कर्म.’
०३) ‘ग्रहणशीलता’ – ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची आणि त्यामध्ये त्या शक्तीची व श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवण्याची ताकद व्यक्तीमध्ये असणे तसेच, व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला व कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य ‘ईश्वरी शक्ती’ला करू देणे म्हणजे ग्रहणशीलता.
व्यक्तीला जर या ‘शक्ती’ची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबत असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची भेसळ होऊ देता कामा नये.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 266)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…