साधना, योग आणि रूपांतरण – १०७
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
…कर्म करत असताना ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे तुमचे कामातील लक्ष विचलित होते, मात्र ज्याला तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही झाली केवळ एक पहिली प्रक्रिया; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘दिव्य उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला होऊ शकली असेल, किंवा श्रीमाताजींची शक्तीच कर्म करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली असेल तर मग, कर्म करत असताना ईश-स्मरणाऐवजी, आपोआप ईश्वराशी नित्य एकत्व पावण्यास तसेच योग-साक्षात्कारास सुरुवात झाली आहे असे समजा.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…