ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योगसाधना करण्याची आवश्यकता

साधना, योग आणि रूपांतरण – ८७

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांच्यामधील अडथळा भेदला गेला की काय होते याचा काहीसा विचार आपण कालच्या भागात केला.)

कोणत्या न् कोणत्या पद्धतीने एकदा का तो अडथळा मोडून पडला की मग तुम्हाला असे आढळू लागते की, योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया आणि गतिविधी या गोष्टी तुमच्या बाह्य मनाला जितक्या कठीण किंवा अशक्यप्राय वाटत होत्या तेवढ्या त्या कठीण नाहीत. त्या तुमच्या आवाक्यातील आहेत. तुमच्या आंतरतम चैत्य पुरुषामध्ये अगोदरपासूनच एक योगी आणि एक भक्त अस्तित्वात आहे आणि तो जर पूर्णपणे उदयाला आला आणि त्याने पुढाकार घेतला तर, तुमच्या बाह्य जीवनाला आध्यात्मिक वळण लागणे हे पूर्वनियोजित आणि अपरिहार्य आहे.

प्रारंभापासूनच जे साधक यशस्वी होतात त्यांच्याबाबतीत योगमय आणि आध्यात्मिक अशा सखोल आंतरिक जीवनाची घडण आधीपासूनच झालेली असते. एवढेच की, त्यांच्या विचारी मनाला आणि कनिष्ठ प्राणिक भागांना शिक्षण आणि गतकालीन कृतींमुळे बलशाली बाह्य वळण दिले गेलेले असते आणि त्यामुळे त्यांचे आंतरिक जीवन पडद्याआड गेलेले असते. मनाला लागलेल्या बाह्यवर्ती वळणामध्ये सुधारणा घडविणे आणि तो पडदा भेदणे यासाठीच त्या साधकाला परिश्रमपूर्वक योगसाधना करण्याची आवश्यकता असते.

एकदा हा आंतरिक पुरुष प्रभावीपणे आविष्कृत झाला, भले मग तो अंतराभिमुख जाण्याने असेल किंवा बाह्याभिमुख येण्याने असेल, त्याचा दबाव पुन्हा प्रस्थापित होणार आणि मार्ग मोकळा होऊन तो त्याचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करणार हे निश्चित! आत्ता जे घडते आहे ते, येथून पुढे मोठ्या प्रमाणावर जे घडणार आहे त्याची नांदी आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218-219)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

18 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago