ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ३७

कधी हृदय-केंद्रामध्ये तर कधी मस्तकाच्या वर लक्ष एकाग्र करण्यामध्ये काही अपाय नाही. परंतु यापैकी कोणत्याही ठिकाणी लक्ष एकाग्र करायचे म्हणजे एखाद्या विशिष्ट बिंदूवर अवधान केंद्रित करायचे असा याचा अर्थ नाही; तर तुम्ही तुमची चेतना या दोन्हीपैकी कोणत्यातरी एका ठिकाणी स्थिर करायची असते आणि एकाग्रता त्या ठिकाणावर नाही तर ‘ईश्वरा’वर करायची असते. ही गोष्ट तुम्हाला जशी योग्य, सोयीस्कर वाटेल त्यानुसार, म्हणजे डोळे उघडे ठेवून किंवा डोळे मिटून तुम्ही करू शकता. तुम्ही सूर्यावर एकाग्रता करू शकता पण सूर्यावर एकाग्रता करण्यापेक्षा ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे हे अधिक चांगले.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 309)

*

(त्राटक करण्याचा दीर्घकालीन अभ्यास नसेल तर) दृष्टी बराच वेळ एका जागी खिळवून ठेवता कामा नये. कारण त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे एका जागी खिळवून ठेवण्याची आवश्यकता नसते; दृष्टी सहजस्वाभाविक ठेवणे पुरेसे असते आणि डोळे मिटून ध्यान करताना दृष्टी ध्यानानुसार बदलली पाहिजे.

*

जेव्हा तुम्ही छायाचित्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करता तेव्हा डोळे उघडे ठेवून ध्यान करणे अधिक चांगले.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

*

प्रयास म्हणजे ओढूनताणून केलेले प्रयत्न. अशीही एखादी संकल्पपूर्वक केलेली कृती असू शकते की ज्या कृतीमध्ये ओढाताण नसते किंवा प्रयास नसतात. एकाग्रतेसाठी ओढूनताणून केलेले प्रयत्न आणि एकाग्रता या भिन्न गोष्टी आहेत. ओढाताणीमध्ये उतावळेपणा आणि प्रयत्नांचा अट्टहास, जोरजबरदस्ती अध्याहृत असते तर एकाग्रता मुळातच शांत आणि स्थिर असते. ज्यामध्ये अस्वस्थता किंवा उतावळेपणा असतो त्यास ‘एकाग्रता’ म्हणता येणार नाही.

– श्रीअरविंद (SABCL 23 : 730)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

18 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago