विचारशलाका २२
बुद्धी, तर्कबुद्धी (Reason) ही सामान्य जीवनाच्या तर्कसंगत क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टींचेच मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, मानवी जीवनातील प्राणिक आणि मानसिक कृतींचे, गतिविधींचे संयोजन आणि नियंत्रण करणे, हेच बुद्धीचे खरे कार्य असते.
समजा, जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल (vital disorder) असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि तेव्हा जर त्या व्यक्तीने बुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या बुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न केला तर अशा प्रत्येक वेळी, ती व्यक्ती या सर्व गोष्टी पुन्हा सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व गतिविधी संघटित करणे आणि त्यांचे नियमन करणे हे बुद्धीचे खरे कार्य आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, की विरोधी आहेत; तुमच्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही बुद्धीचा आश्रय घेऊ शकता. या व अशा सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे हे बुद्धीचे कार्यक्षेत्र आहे आणि कदाचित त्यापेक्षा काकणभर अधिकच असे म्हणता येईल: अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे हे पाहणे; तसेच त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, त्यामुळे तो आवेग चालवून देण्यायोग्य आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम बुद्धीचे आहे. हे बुद्धीचे संपूर्ण कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.
– श्रीमाताजी [CWM 07 : 166-167]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…