आध्यात्मिकता २४
ज्यांना आध्यात्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आत्म-नियंत्रण, आत्म-प्रभुत्व, परीमितता, इच्छाविरहितता, जिवाच्या आंतरिक सत्याचा आणि त्याच्या आत्माविष्करणाच्या नियमाचा शोध या गोष्टी अगदी आवश्यक आहेत असे आपण म्हणू शकतो. स्वतःशी, स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक असणे, स्वतःला अस्ताव्यस्त भावावेगांबरोबर वाहवत जाऊ न देणे, बदलणाऱ्या रूपांना ‘वास्तविकता’ अथवा ‘सत्य’ न मानणे, या गोष्टी अध्यात्म-मार्गावर प्रगत होण्यासाठी व्यक्तीकडे असणेच आवश्यक असते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 191]
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…