आध्यात्मिकता २२
मनुष्य एकदा जरी स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी संमती देऊ शकला तरी सारेकाही बदलून जाईल; परंतु त्याची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मनुष्य स्वत:च्या अपूर्णतेवर प्रेम करतो.
‘आत्मा’ हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण त्यांच्या परिपूर्ण दशेमध्ये तेच त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत.
केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामुळे स्वर्ग-गमनासाठी कित्येक जीव तयार होतात, परंतु ते पृथ्वीला मात्र, ती जिथे होती तिथेच सोडून जातात.
– श्रीअरविंद [CWSA 13 : 210]
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…