प्रकृतीचे परिवर्तन
फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे दिसत नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते हानिकारकच ठरले आहे.
प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणात एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टींची आवश्यकता असते. कर्माविना प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनानंतर लोकांच्या संपर्कामध्ये आल्यावरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये (खरंच) परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.
व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असू दे, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. श्रीमाताजींना अर्पण केली जाणारी आणि त्यांच्यासाठी व त्यांच्या शक्तिनिशी केली जाणारी सर्व कर्मं एकसमान (मोलाची) असतात.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)
- प्रकृतीचे परिवर्तन - August 14, 2026
- ध्यान – जवळचा मार्ग? - August 13, 2026
- प्रकृतीचे शुद्धीकरण - August 10, 2026






