जागरुकता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय.
तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा किंवा तुम्ही एखाद्या प्रलोभानास बळी पडण्यास स्वत:ला मुभा देत असाल तर अशा वेळी (निष्क्रिय) जागरुकता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर सक्रिय जागरुकता ही प्रगतीची संधी मिळविण्यासाठी धडपडत असते, त्वरेने प्रगती करता यावी म्हणून, प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी ती प्रयत्नशील असते.
तुमचे पतन होण्यापासून तुम्हाला रोखणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. जो जागरूक नाही, दक्ष नाही तो जणूकाही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या प्रयोजनाशी असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो. अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका गर्तेत पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 202-203]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…