समत्व म्हणजे नवे अज्ञान किंवा आंधळेपण नव्हे; समत्व हे दृष्टीमध्ये धूसरता आणण्याची तसेच सर्व रंगामधील भिन्नता पुसून टाकण्याची अपेक्षा बाळगत नाही किंवा त्याची आवश्यकताही नसते. विभिन्नता असणारच आहे, अभिव्यक्तीमध्ये वैविध्यही असणार आहे आणि त्याची आपण कदर केली पाहिजे. आपली दृष्टी जेव्हा आंशिक तसेच चुकीच्या प्रेमाने व द्वेषाने, प्रशंसेने व तिरस्काराने, सहानुभूती व विरोधी भावनेने आणि अनुकूल व प्रतिकूल भावनेने मलीन झालेली होती त्यापेक्षा, आपण आता (समत्व दृष्टीच्या साहाय्याने) त्या विविधतेची अधिक न्याय्य प्रकारे कदर करू शकू. मात्र या विविधतेच्या पाठीमागे असलेल्या आणि जो त्या विविधतेमध्ये निवास करतो त्या ‘परिपूर्ण’ आणि ‘अपरिवर्तनीय’ ईश्वरास आपल्याला नेहमीच पाहता आले पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीव व्हावयास हवी, आपल्याला त्याचे ज्ञान व्हावयास हवे. किंवा जर तो ईश्वर आपल्यापासून गुप्त असेल तर किमान – आपल्या मानवी मापदंडांना विशिष्ट आविष्कार हा सुसंवादी व परिपूर्ण वाटतो की ओबडधोबड आणि अपूर्ण की अगदी मिथ्या व अनिष्ट वाटतो, यास महत्त्व न देता – त्या विशिष्ट आविष्काराची ईश्वरी आवश्यकता आणि त्या पाठीमागे असणाऱ्या सुबुद्ध प्रयोजनावर तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 224-225)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…