प्रामाणिकपणा – २४
(व्यक्तीचे अस्तित्व विविध भागांमध्ये विखुरलेले असते, त्याचे एकीकरण कसे करायचे यावरचा उपाय श्रीमाताजी सांगत आहेत…..)
….त्यावर केवळ एकच उपाय आहे, असा एक आरसा असला पाहिजे की जो आरसा, व्यक्तीच्या भावना, आवेग, सर्व संवेदना यांच्यासमोर धरला असता, व्यक्ती या साऱ्या गोष्टी त्यात पाहील. दिसायला सुंदर, आनंददायी नसतील अशाही काही गोष्टी त्यामध्ये दिसतील; तर काही सुंदर, सुखद असतात आणि जपून ठेवाव्या अशाही काही गोष्टी त्यामध्ये दिसतील. आवश्यकतेनुसार व्यक्ती दिवसभरात शंभर वेळादेखील त्या आरशामध्ये बघेल. आणि ते खूप रोचक असते. व्यक्ती या चैत्य आरशाभोवती एक प्रकारचे मोठे वर्तुळ काढते आणि सर्व घटक त्या आरशाच्या आजूबाजूला मांडून ठेवते. अयोग्य असे जर काही त्यांमध्ये असेल तर त्याची या आरशामध्ये एक प्रकारची धूसर छाया पडते हा घटक व्यक्तीने दूर केलाच पाहिजे, योग्य त्या जागी ठेवलाच पाहिजे… त्याच्याशी बोलले पाहिजे, त्याला समजावून सांगितले पाहिजे, व्यक्तीने त्या काळोखातून बाहेर पडलेच पाहिजे. तुम्ही जर असे करत असाल, तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. लोक जेव्हा तुमच्याशी प्रेमाने वागत नाहीत, जेव्हा कधी डोकं सर्द झालेले असते, जेव्हा कधी अभ्यास कसा करायचा ते समजत नाही, असे काही घडते तेव्हा व्यक्ती या आरशात बघायला लागते. हे खूप गंमतीशीर असते, त्यातच व्यक्तीला एक प्रकारचा डाग आढळतो. ‘आपण खूप प्रामाणिक आहोत असे आपल्याला वाटत होते,’ पण नाही, तसे अजिबात नव्हते. (असे त्या व्यक्तीला कळते.)
या जगामध्ये रोचक नाही अशी एकही गोष्ट नाही. हा आरसा खूपच छान, खूपच छान प्रकारे बनविण्यात आलेला असतो. असे दोन, तीन, चार वर्षे करा, कधीकधी तर व्यक्तीला वीसवीस वर्षे असे प्रयत्न करावे लागतात. मग काही वर्षांनंतर, परत मागे वळून पाहा, तीन वर्षांपूर्वी तुम्ही काय होतात ते आठवून पाहा. (तुम्ही मनातल्या मनात म्हणता की,) : “मी किती बदललो आहे… काय? मी असा होतो?” “तेव्हा मी असे बोलूच कसा काय शकलो? मी असं बोलू शकतो? असा विचार करू शकतो? …खरंच, मी किती वेडा होतो… आता मी किती बदललो आहे…”
हे सारे खूपच मनोरंजक असते…
– श्रीमाताजी [CWM 05 : 10-11]
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…