प्रामाणिकपणा – २०
तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य-असत्य यातील भेद जाणवेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांनाच तो सत्य मानू लागतो. जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे तो त्याची अभीप्सा गमावून बसतो, साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. आकलन, संवेदना आणि साक्षात अनुभूतीच्या सर्व शक्यता तो गमावून बसतो. हीच शिक्षा असते.
असा माणूस स्वत:हून, स्वत: आणि ‘ईश्वर’ यांच्या दरम्यान अडथळे, आवरणे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतो. ‘ईश्वर’ मागे सरत नाही तर, तो माणूसच स्वतःला ‘ईश्वरा’चा स्वीकार करण्यास अक्षम बनवितो. अशाप्रकारे, ‘ईश्वर’ हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस असे हे अजिबात काही नसते.
एखादी व्यक्ती जेव्हा अप्रामाणिक असते, जेव्हा व्यक्ती दुरिच्छा बाळगते, जेव्हा ती कृतघ्न असते तेव्हा अशी व्यक्ती तत्काळ स्वत:लाच शिक्षा करून घेत असते. अशी जी अप्रामाणिक माणसं असतात, त्यांच्याकडे जी काही थोडीफार चेतना शिल्लक असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. वास्तविक त्या चेतनेमुळेच आपण स्वत: दुष्ट आहोत हे त्यांना कळू शकले असते, पण आता ते ती चेतनाच गमावून बसलेले असतात. इतके की जणुकाही ते निश्चेतन (unconscious) असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी, त्यांना काहीच समजेनासे होते.
– श्रीमाताजी [CWM 05 : 21-22]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…