प्रामाणिकपणा – १९
(श्रीमाताजी येथे प्राणशक्तीच्या दुर्बलतेविषयी काही सांगत आहेत.)
प्राणशक्ती (vital power) दुर्बल असेल तर तुमची अभीप्साही दुर्बल असते. असे लक्षात घ्या की, दुर्बलता हाच एक प्रकारचा अप्रामाणिकपणा असतो, दुर्बलता ही व्यक्तीने स्वत:च स्वत:ला दिलेली एक सबब असते; कदाचित ती फार जाणीवपूर्वकपणे दिलेली असते असेही नाही, पण तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, अवचेतना (subconscient) हे असे एक स्थान आहे की, जेथे अप्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. आणि “मला अमुक एक गोष्ट करायला आवडली असती, पण ती करणे मला शक्य नाही”, असे जी दुर्बलता म्हणते, ती दुर्बलता नसून, ती अप्रामाणिकता असते. कारण जर का एखादी व्यक्ती खरंच प्रामाणिक असेल तर ती व्यक्ती जे आज करू शकत नाही ते उद्या करू शकते, आणि जे ती उद्या करू शकणार नाही ते ती परवा करू शकते आणि असे कधीपर्यंत ? तर तिला ती गोष्ट करणे जमू लागते तोपर्यंत.
….सर्व प्रकारचे दुःखभोग, सर्व दुर्बलता, सर्व अक्षमता यांचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, या साऱ्या गोष्टी म्हणजे अंतिमत: अप्रामाणिकताच असतात. अशी अनेक ठिकाणे असतात की, जेथे अप्रामाणिकता नांदू शकते आणि म्हणून ”मी अगदी प्रामाणिक आहे”, असे जी कोणी माणसं मला नेहमी सांगत असतात, त्यांनी तसे कधीही म्हणू नये. “मी कधीच खोटे बोललेलो नाही”, असे माणसे छातीठोकपणे सांगत असतात, तोही तसाच प्रकार आहे. तुम्ही जर खरोखरच पूर्ण प्रामाणिक असतात, तर तुम्ही ‘ईश्वर’च झाला असतात, तुम्ही खरोखर कधीच खोटे बोलला नसतात, तर तुम्ही साक्षात ‘सत्य’च बनला असतात. पण, प्रत्यक्षात तुम्ही ‘ईश्वर’ही नाही किंवा ‘सत्य’ही नाही (तत्त्वरूपाने तुम्ही तसे आहात पण वास्तवात तसे नाही.) असे असल्याने, ‘सत्य’ आणि प्रामाणिकपणा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नेहमीच खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात असू द्या.
– श्रीमाताजी [CWM 04 : 252-253]
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…