प्रामाणिकपणा – १८
सर्व प्रकारच्या अनुभवांची योग्यता ही व्यक्तीच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात आणि अद्भुत असे अनुभव रचतात आणि ते अशी कल्पना करू लागतात की, त्यांना तसे अनुभव (खरोखरच) आले आहेत. मी त्यांच्याबाबत येथे काही बोलू इच्छित नाही. पण जे लोक प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात त्यांच्याबद्दल सांगायचे तर, जेव्हा तुम्हाला ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती मिळते, त्याच्या उपस्थितीची जाणीव होते तेव्हा सर्व जगाने जरी सांगितले की, ‘तुमचा तो अनुभव खरा नाही’, तरी त्याने तुम्ही यत्किंचितही विचलित होत नाही.
– श्रीमाताजी [CWM 04 : 135]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…