‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
दि. ०७ डिसेंबरला श्रीमाताजींनी लिहिले आहे – “हे प्रभू, तुमचे कार्य जोवर साध्य होत नाही तोवर तुम्ही आमच्या सोबत असाल, मार्गदर्शन आणि प्रबोधन करणारी केवळ चेतना म्हणूनच नव्हे तर, कृतीमधील गतिशील ‘उपस्थिती’ म्हणूनदेखील तुम्ही आमच्या सोबत असाल, असा विश्वास तुम्ही मला आज सकाळी दिला आहे. जोवर पृथ्वीचे रूपांतरण होत नाही तोवर तुमच्यामधील सारे सारेकाही येथेच राहील; तोवर तुम्ही पृथ्वीचे वातावरण सोडून जाणार नाही, असे अगदी निःसंशय पद्धतीने तुम्ही वचन दिले आहे. या अद्भुत ‘उपस्थिती’ ला आम्ही सुपात्र ठरू आणि आमच्यामधील प्रत्येक गोष्ट यापुढे, तुमच्या उदात्त कार्याच्या परिपूर्तीसाठी अधिकाधिक परिपूर्णपणे समर्पित व्हावी या एकाच इच्छेवर केंद्रित होवो, असे आम्हास वरदान द्या.”
“श्रीअरविंदांनी देह ठेवण्याचा जो निर्णय घेतला त्याला पृथ्वीच्या आणि माणसांच्या ग्रहणशीलतेचा अभाव कारणीभूत ठरला. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, शारीरिक स्तरावर हे जे काही घडले त्याचा त्यांच्या शिकवणुकीच्या सत्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांनी जे सांगितले आहे ते पूर्णतया सत्य आहे आणि ते तसेच राहणार आहे. येणारा काळ आणि घटनाक्रम ते सत्य असल्याचे सिद्ध करतील.
देह ठेवल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे दि. ०९ डिसेंबर १९५० श्रीअरविंदांचा देह आश्रमातील प्रांगणामध्ये समाधिस्थ करण्यात आला. (क्रमश:)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…