‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंदांमध्ये १९४८ ते १९४९ च्या दरम्यान आजारपणाची काही लक्षणं दिसून आली. मध्यंतरीच्या काळात ती दिसेनाशी झाली होती पण कालांतराने म्हणजे १९५० च्या मध्यावर ती पुन्हा एकदा दिसू लागली. आणि दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी पहाटे ०१ वाजून २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी देह ठेवला.
श्रीअरविंद यांचा देह समाधि-स्थानी ठेवण्याची सारी व्यवस्था करण्यात आली होती पण सहा डिसेंबरला संध्याकाळी श्रीमाताजींनी पुढील संदेश प्रसृत केला की, “श्रीअरविंदांचा अंतिमसंस्कार आज करण्यात आलेला नाही. त्यांच्या देहामध्ये ‘अतिमानसिक प्रकाशा’चे (Supramental Light) संघनीकरण झालेले असल्यामुळे, त्या देहावर विघटनाची कोणतेही चिन्ह दिसत नाही आणि जोवर तो देह जसाच्या तसा आहे तोवर त्यांचा देह तसाच ठेवण्यात येईल.’’
श्रीअरविंदांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
श्रीअरविंद यांच्या महासमाधीनंतर ५ दिवसपर्यंत देह विघटन न होता तसाच कायम राहणे, या अद्भुत घटनेची नोंद The Hindu यासारख्या तत्कालीन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी देखील घेतली होती. पुढे त्या घटनेचे स्पष्टीकरण करताना ज्येष्ठ साधक श्री. अमल किरण (श्री. के. डी. सेठना) यांनी असे म्हटले होते की, “श्रीअरविंद यांच्या देहाभोवती अनेकांनी पाहिलेला अद्भुत सोनेरी प्रकाश पाच दिवस, त्यावरील तजेला निघून न जाता किंवा त्याला विघटनाचा किंचितसाही स्पर्श न होता, तसाच टिकून राहणे, ही गोष्ट म्हणजे, त्यांनी स्वत:च्या भौतिक देहरूपी-रचनेचा त्याग करून, पृथ्वीसाठी जो विजय संपादन केला होता, त्या विजयाचे द्योतक आहे.”(क्रमश:)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…