‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंद एकांतवासात गेले तेव्हापासून, म्हणजे सन १९२६ पासून ते १९५० पर्यंतच्या कालावधीतील त्यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. कारण जेव्हा त्यांचे छायाचित्र काढण्याची परवानगी मागण्यात आली होती तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता आणि टिप्पणी केली होती : “बऱ्याच लोकांनी यापूर्वी देखील असा प्रस्ताव मांडला होता.”
छायाचित्रांची ही प्रतीक्षा एप्रिल १९५० मध्ये संपली, जेव्हा हेन्री कार्टियर-ब्रेसाँ (फ्रेंच छायाचित्रकार) यांना श्रीअरविंद यांच्या खोलीत त्यांच्या छायाचित्रांची मालिका घेण्याची परवानगी मिळाली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र दि. २४ एप्रिल १९५० या दर्शनदिनी काढण्यात आलेले आहे. (हे छायाचित्र आजच्या post सोबत जोडत आहोत.) पुढे सात महिन्यांनंतर, ५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद यांनी देह ठेवला. अशाप्रकारे कार्टियर-ब्रेसाँ यांनी काढलेली छायाचित्रे ही श्रीअरविंद यांच्या हयातीत काढली गेलेली शेवटची छायाचित्रे ठरली.
हेन्री कार्टियर-ब्रेसाँ १९५० मध्ये पाँडिचेरीला आले तेव्हा ते जगातील आघाडीच्या छायाचित्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. रमण महर्षी, महात्मा गांधी यांची त्यांनी काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध होती.
श्रीअरविंद यांच्या दहा मिनिटांच्या दर्शनाने कार्टियर-ब्रेसाँ प्रभावित झाले. बाहेर ब्रेसाँ यांची वाट पाहत असलेल्या मंडळींनी उत्सुकतेने विचारले, “छायाचित्रण कसे झाले?” कार्टियर-ब्रेसाँ यांनी उत्तर दिले, “त्यांच्यासारखी व्यक्ती मी आजवर पाहिलेली नाही. ते तिथे अगदी अविचल बसले होते.” (क्रमश:)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…