‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
आता येथील आश्रमीय जीवन म्हणजे साधकांची साधना, त्यांचे कर्म, आणि त्याहून अधिक म्हणजे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींची साधना या साऱ्या गोष्टी एका लयीमध्ये सुरू होत्या… अगदी २४ नोव्हेंबर १९३८ च्या दर्शनदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सारे काही सुरळीत चालू होते.
श्री. ए. बी. पुराणी (श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी) यांच्या शब्दांत सांगायचे तर, “दि. २४ च्या पहाटे, २.२० ते २.३० च्या दरम्यान श्रीमाताजींनी बेल वाजवली. मी जिन्यावरून धावतपळत वर जाऊन पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की, श्रीअरविंदांच्या पायाला अपघात झाला आहे आणि मी डॉक्टरांना बोलवावे. या अपघातामुळे त्यांच्या एकांतवासामध्ये बदल घडून आला आणि आता त्यांची देखभाल करणाऱ्या लोकांशी ते बोलू-भेटू लागले. येथे बारा वर्षांचा एक दीर्घ कालावधी सुरु झाला, ज्यामध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीनुसार कमीअधिक फरक करण्यात आला, आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाशी सुद्धा थेट भौतिक संपर्क साधणे शक्य झाले.”
झालेल्या अपघातामुळे, २४ नोव्हेंबर आणि २१ फेब्रुवारी १९३९ ला त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. साधकांच्या विनंतीला मान देत श्रीअरविंदांनी दि. २४ एप्रिल १९३९ ला विशेष दर्शन दिले, श्रीमाताजी १९२० साली जेव्हा पाँडिचेरीला कायमच्या वास्तव्यास आल्या तो हा दिवस होता. तेव्हापासून हा दिवस ‘दर्शनदिन’ म्हणून संबोधण्यात येऊ लागला.
अपघाताचा परिणाम म्हणून आता श्रीअरविंद यांनी साधकांबरोबरचा पत्रव्यवहार थांबविला होता. परंतु त्यांच्या बरोबरच्या संपर्काचे एक नवीनच रूप उदयाला आले. तो संपर्क आता अधिक मर्यादित होता पण तो अधिक निकटचा होता. या अपघातानंतर श्रीअरविंदांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईपर्यंत सहासात साधकांवर, (त्यामध्ये बहुतांशी डॉक्टर मंडळी होती) श्रीअरविंदांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीमध्ये या साधकांसमवेत श्रीअरविंद यांची अनेकानेक विषयांवर चर्चा होत असे. या चर्चामधूनच श्री. निरोदबरन लिखित ‘Twelve years with Sri Aurobindo’ या पुस्तकाची निर्मिती झाली. बरेचदा चालू जागतिक घडामोडींवर या चर्चा चालत असत. १९३९ मध्ये जेव्हा युरोपामध्ये युद्धाची घोषणा करण्यात आली तेव्हा श्रीअरविंद वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि रेडिओच्या माध्यमातून युद्धाची खबरबात घेऊ लागले. (क्रमश:)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…