‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
(श्रीअरविंदांचे एक अनुयायी श्री. के. डी. सेठना ‘श्रीअरविंद’ या नामाविषयी काही खुलासा करत आहेत…)
श्रीअरविंदांनी स्वतःच्या आध्यात्मिक वाटचालीच्या दरम्यान एका विशिष्ट टप्प्यावर ‘श्रीअरविंद’ असे नाम धारण केले. त्यापूर्वी ते अरविंद घोष किंवा ए.जी. अशी सही करत असत. ‘आर्य’ च्या कालखंडामध्ये देखील ते अरविंद घोष अशीच सही करत असत. विसाव्या दशकाच्या मध्यावर ‘श्री. अरविंद घोष’ हे ‘श्रीअरविंद’ बनले असावे असे मला वाटते. त्यांच्या स्वाक्षरीमधील बदल हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील रूपांतरणाचे द्योतक होते. कदाचित त्यांच्या स्वतःच्या देहामध्ये जेव्हा अधिमानस चेतनेचे अवतरण झाले त्या दिवसानंतर म्हणजे दि. २४ नोव्हेंबर १९२६ नंतर हा बदल घडून आला असावा. वास्तविक हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. हे नवीन नाम महत्त्वाचे आहे कारण ते आध्यात्मिक साक्षात्कारानंतर उदयाला आलेले होते. ते केवळ साधकवर्गाने केलेल्या गौरवातून उदयाला आलेले नव्हते. श्रीमाताजी एकदा म्हणाल्या होत्या, “आपण आपल्या प्रभूंना (श्रीअरविंद यांना) ज्या नामाने ओळखतो त्या नामाचा ‘श्री’ हा अविभाज्य भाग आहे.”
यातून हेच ध्वनित होते की, आपण म्हणजे भारतीयांनी आणि पाश्चात्त्यांनीदेखील त्यांना श्रीअरविंद असेच म्हणावे असे श्रीमाताजींना अपेक्षित होते.
कदाचित या अवस्थांतराची चाहूल श्रीअरविंद यांना आधीच लागली होती असे दिसते. कारण दि. २२ मार्च १९२६ च्या एका पत्रामध्ये आशीर्वाद देताना, पत्राखाली ‘श्रीअरविंद’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (क्रमश:)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…