‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
मीरा अल्फासा (श्रीमाताजी) दि. २४ एप्रिल १९२० रोजी या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पाँडिचेरी येथे परतल्या.
पुढे एकदा कधीतरी त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, ”मी जेव्हा जपानहून परत येत होते (१९२० साली) तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.
पुढे ‘सत्प्रेम’ या एका साधकाशी बोलताना त्या म्हणतात, ”जेव्हा मी जपानवरून परतले तेव्हा आम्ही दोघांनी (श्रीअरविंद आणि मी) एकत्रितपणे कार्य सुरु केले; त्यांनी अगोदरच मनोमय जगतामध्ये अतिमानसिक प्रकाश उतरविलेला होता आणि ते मनाचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नात होते. श्रीअरविंद मला म्हणाले, “हे खूपच विलक्षण आहे, हे कधीही न संपणारे कार्य आहे. वास्तविक सर्व काही करून झाले आहे तरीही काहीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हापुन्हा परत एकदा तेच सगळे करावे लागत आहे.” (क्रमश:)
(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो…
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…