‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
मीरा अल्फासा (श्रीमाताजी) दि. २४ एप्रिल १९२० रोजी या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पाँडिचेरी येथे परतल्या.
पुढे एकदा कधीतरी त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, ”मी जेव्हा जपानहून परत येत होते (१९२० साली) तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.
पुढे ‘सत्प्रेम’ या एका साधकाशी बोलताना त्या म्हणतात, ”जेव्हा मी जपानवरून परतले तेव्हा आम्ही दोघांनी (श्रीअरविंद आणि मी) एकत्रितपणे कार्य सुरु केले; त्यांनी अगोदरच मनोमय जगतामध्ये अतिमानसिक प्रकाश उतरविलेला होता आणि ते मनाचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नात होते. श्रीअरविंद मला म्हणाले, “हे खूपच विलक्षण आहे, हे कधीही न संपणारे कार्य आहे. वास्तविक सर्व काही करून झाले आहे तरीही काहीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हापुन्हा परत एकदा तेच सगळे करावे लागत आहे.” (क्रमश:)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…