‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
दिव्य चेतनेचे माध्यम म्हणून कार्य करू पाहणाऱ्या योगी अरविंद आणि मीरा व पॉल रिचर्ड्स या त्रयीने मिळून ‘आर्य’ नावाचे मासिक काढावयाचे ठरविले. १५ ऑगस्ट १९१४ रोजी ‘आर्य’ या तत्त्वज्ञानात्मक मासिकाच्या प्रकाशनाला आरंभ केला. त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्याची जबाबदारी मीरा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वर्गणीदारांची यादी त्यांनी स्वत: लिहून काढली. त्या जमाखर्च ठेवू लागल्या. ‘आर्य’च्या फ्रेंच आवृत्तीसाठी पॉल रिचर्डस् हे अरविंदांचे लिखाण फ्रेंचमध्ये अनुवादित करत. त्या कामातही मीरा त्यांना मदत करू लागल्या….
नंतर अरविंदांचे बहुतेक सगळे मुख्य लिखाण, म्हणजे Isha Upanishad, Essays on the Gita, Life Divine, The Synthesis of Yoga हे ‘आर्य’ या नियतकालिकामध्ये क्रमशः प्रकाशित होत असे. योगसाधना करत असताना त्यांच्यामध्ये ज्या आंतरिक ज्ञानाचा उदय झाला ते ज्ञान या ग्रंथांमध्ये शब्दबद्ध झाले आहे.
त्यांचे इतर लिखाण हे भारतीय सभ्यता व संस्कृतीचे महत्त्व आणि तिचा आत्मा, वेदांचा खरा अर्थ, मानवी समाजाची प्रगती, काव्याचा विकास आणि त्याचे स्वरूप, मानवी वंशाच्या एकात्मतेची शक्यता या विषयांशी संबंधित आहे. इंग्लंडमध्ये व बडोद्यात असताना आणि नंतर राजकीय चळवळीच्या कालावधीमध्ये आणि पाँडिचेरीच्या वास्तव्यामधील पहिल्या काही वर्षांमध्ये त्यात आणखी काही कवितांची भर पडली, अशा सर्व कविता त्यांनी याच सुमारास प्रकाशित करण्यास सुरुवात केली.
मात्र दि. २२ फेब्रुवारी १९१५ पॉल व मीरा फ्रान्सला जाण्यासाठी निघावे लागले; निमित्त होते पहिल्या महायुद्धाचे. आता दर महिन्याला ६४ पाने लिहिण्याची जबाबदारी एकट्या अरविंदांवर येऊन पडली होती. (क्रमश:)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…