‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
कैदी म्हणून अलिपूर तुरुंगातील एका वर्षाच्या कारावासानंतर इ. स. १९०९ च्या मे महिन्यामध्ये जेव्हा अरविंद घोष निर्दोष सुटून बाहेर आले तेव्हा त्यांना आढळले की, संघटना विखुरली आहे; तिचे पुढारी तुरुंगावासामुळे, हद्दपार केल्यामुळे किंवा स्वत:हून अज्ञातवासात गेल्यामुळे विखुरले गेले आहेत तरीही पक्ष अजून तग धरून आहे पण तोदेखील मूक व चैतन्यहीन झाला आहे आणि कोणत्याही कठोर कृतीसाठी तो सक्षम राहिलेला नाही. भारतातील राष्ट्रवादी नेत्यांपैकी ते एकमेव नेते शिल्लक उरले होते त्यामुळे त्यांना राष्ट्रीयत्वाच्या पुनरुज्जीवनासाठी जवळजवळ एक वर्ष अगदी एकाकीपणे झगडावे लागले. त्यांच्या या प्रयत्नांना साहाय्य लाभावे म्हणून ते या कालावधीत ‘कर्मयोगिन्’ हे इंग्रजी साप्ताहिक तर ‘धर्म’ हे बंगाली साप्ताहिक प्रकाशित करत असत.
सरतेशेवटी अरविंदांच्या लक्षात आले की, त्यांची ध्येयधोरणे आणि त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याइतपत राष्ट्राची तयारी झालेली नाही. अलीपूर कारावासातील १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जी पूर्णवेळ योगसाधना केली होती त्याचा परिणाम म्हणून, त्यांचे आंतरिक आध्यात्मिक जीवन, त्यांच्याकडून निरपवाद एकाग्रतेची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनी निदान, काही काळासाठी तरी राजकीय क्षेत्रामधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
*
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही.
पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या ‘कर्मयोगिन्’ या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला (आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.) येथे अरविंदांच्या राजकीय जीवनाची परिसमाप्ती झाली होती. (क्रमश:)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…