‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष – ०७
बडोद्यामध्ये आल्यानंतरही अरविंद घोषांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेट्यांमधील पुस्तके ते वाचत असत. अरविंदांना बंगाली शिकविणारे शिक्षक सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तास न् तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले गेले असते तरीही त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”
इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करत असत.
अरविंदांच्या निकटवर्तीयांपैकी एकाने सांगितलेली अजून एक आठवण –
मी अरविंद घोषांची अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे, त्यांना पैशाबद्दल आसक्ती नव्हती. त्यांना एका पिशवीमध्ये तीन महिन्यांचा पगार एकत्रितपणे मिळत असे, तो पगार टेबलावर असलेल्या एका ट्रे मध्ये ते रिकामा करत असत. पैसे कडीकुलुपामध्ये, तिजोरीमध्ये बंदिस्त करून ठेवणे त्यांना मानवत नसे. होणाऱ्या खर्चाचा ते कधीही हिशोब मांडत नसत. एकदा असेच मी सहज त्यांना विचारले की “तुम्ही पैसे असे का ठेवता?” ते हसले आणि म्हणाले, “आपण चांगल्या आणि प्रामाणिक लोकांमध्ये राहत आहोत याची ही खूणच नाही का?’ त्यावर मी त्यांना विचारले, “पण तुमच्या भोवतीच्या या लोकांचा प्रामाणिकपणा पारखण्यासाठी तरी तुम्ही त्या पैशाचा हिशोब कुठे ठेवता?” तेव्हा गंभीर चेहऱ्याने ते म्हणाले, “तो ईश्वरच माझा जमाखर्च सांभाळतो. मला जेवढे आवश्यक आहे तेवढे तो मला देतो आणि उरलेले स्वत:कडेच ठेवतो. तो मला काही कमी पडू देत नाही, मग मी कशाला काळजी करू?” (क्रमश: …)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…