‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष – ०१
अरविंद घोष यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड क्षमता असलेले अरविंद घोष यांचे वडील श्री. कृष्णधन घोष हे, शिक्षणासाठी सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये जाणाऱ्या काही लोकांपैकी एक होते. श्री. कृष्णधन घोष भारतात परतले तेव्हा सवयी, कल्पना आणि आदर्श यांबाबत ते पूर्णपणे इंग्रजाळलेले होते. त्यांच्यावर इंग्रजांचा एवढा प्रभाव पडला होता की, आपल्या मुलांना पूर्णपणे युरोपियन पद्धतीनेच वाढवायचे हा जणू श्री. कृष्णधन घोष यांनी पणच केला होता.
घोष कुटुंबीय भारतात रहात होते तेव्हा अरविंदांना दार्जिलिंगमधील आयरीश ननच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. १८७९ साली श्री. कृष्णधन घोष यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना इंग्लंडला नेले आणि तेथे एका इंग्लिश धर्मोपदेशकाकडे व त्याच्या पत्नीकडे त्यांना सोपविले. त्या तिघांवर कोणतेही भारतीय संस्कार होऊ नयेत वा त्यांचा भारतीयांशी कोणताही परिचय होऊ नये अशी खबरदारी त्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना त्या पती-पत्नीला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे अरविंद लहान असताना भारत, भारतातील लोक, भारतीयांचा धर्म, भारतीयांची संस्कृती या साऱ्यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञच राहिले होते. (क्रमश: …)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…