एखादा भूकंप होतो, किंवा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा जर त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात माणसं राहत असतील तर या घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो, आणि अर्थातच त्यांच्यासाठी ती एक आपत्ती ठरते, ‘निसर्गा’साठी मात्र ती एक गंमत असते. आपण म्हणतो, “काय भयंकर वारा सुटला आहे?” साहजिकच आहे, माणसांसाठी तो “भयंकर” असतो, पण ‘निसर्गा’साठी मात्र तो तसा नसतो. हा प्रमाणाचा प्रश्न असतो, नाही का? एखादी उच्चतर शक्ती आविष्कृत होण्याची इच्छा बाळगत आहे आणि ‘प्रकृती’कडून तिला प्रतिरोध होत आहे, असे घडणे शक्य आहे, पण हे आवश्यक मात्र नाही.
ही गोष्ट अगदी सहज समजण्यासारखी आहे की, महाकाय शक्तींबरोबर ‘प्रकृती’चा चाललेला हा खेळ असतो आणि तिच्यासाठी ती केवळ एक लीला असते; तिच्या दृष्टीने त्यात कोणत्याही प्रकारे आपत्तीजनक असे काहीही नसते. ‘प्रकृती’-चेतनेच्या किंवा जडभौतिक चेतनेच्या दृष्टीने, पृथ्वीवरील भौतिक आकार आणि मानवजात या गोष्टी म्हणजे जणू काही मुंग्यांसारख्याच असतात. तुम्ही स्वतःदेखील जेव्हा चालत असता तेव्हा, तुम्ही तुमच्या पायाखाली मुंग्या चिरडू नयेत म्हणून तुमचा मार्ग बदलणे आवश्यक समजत नाही. (अर्थात तुम्ही कट्टर ‘अहिंसक’ असलात तर बाब निराळी!) तुम्ही चालत असता आणि तुमच्या पायांखाली शेकडो मुंग्या आल्या तरी काही इलाज नसतो. ‘प्रकृती’चेही अगदी असेच असते. ती वाटचाल करत असते आणि तिच्या त्या वाटचालीत तिच्या पायदळी तिने हजारो माणसं जरी नष्ट केली तरी ती बाब तिच्यासाठी इतकी महत्त्वाची नसते कारण ती अशी लाखो माणसे पुन्हा निर्माण करू शकते. तिच्यासाठी ते अवघड नसते.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 175)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…